मुलींनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टाळला आणि आईचा जीव वाचला अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे ही घटना घडली आहे. जावेद शेख याने त्याची पत्नी परवीन शेखला भिंगान दमला परिसरातील शेतामध्ये अमानुष मारहाण केली. या मारहाणीत परवीन बेशुद्ध झाली.
दुसऱ्याचा नावाचे सिम कार्ड घेऊन वापरल्याचा आरोप
निलेश घायवळवर कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या आज पुण्यात झालेल्या राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुण्यात येणार आहेत.
उद्या सकाळी पुणे पोलीस आयुक्त यांची 11.30 वाजता घेणार भेट.
आज पुण्यात मनसे आणि अभाविप यांच्यात झाला होता राडा..
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि माहीमदरम्यान धावणाऱ्या एका ट्रेनला संध्याकाळी सिग्नल बिघाडाचा सामना करावा लागला. स्थानकांदरम्यान असलेला सिग्नल क्रमांक A384 अचानक ब्लँक ऑफ झाला. ज्यामुळे ट्रेनने नियमांनुसार तो सिग्नल पार केला. त्यानंतरचा सिग्नल A386 देखील बंद स्थितीत आढळला. तोही नियमानुसार पार करण्यात आला. या दरम्यान APR AWS प्रणाली कार्यरत झाली. या घटनेमुळे ट्रेनला माटुंगा ते माहीम दरम्यान सुमारे 10 मिनिटांचा विलंब झाला.
बीडमध्ये छगन भुजबळांची महाएल्गार सभा होणार आहेत.
ओबीसीचे सर्व नेते महाएल्गार सभेला उपस्थित राहणार आहेत.
मागील आठवड्यातच होणार होती, महाएल्गार सभा मात्र पाऊस असल्याने एल्गार सभा रद्द करण्यात आली होती.
अखेर या सभेची तारीख ठरली 11 ऑक्टोबरला
मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील 10व्या रोडवरील काँक्रीट रस्ता, अवघ्या एका वर्षापूर्वी नव्याने तयार करण्यात आला होता. मात्र, आता तोच रस्ता पुन्हा उखडण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नुकताच तयार झालेला हा काँक्रीट रस्ता ‘गहाळ पाईपलाइन’ टाकण्यासाठी पुन्हा खोदण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. यावरून महापालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो, असे नागरिकांचे मत आहे.
'माय बीएमसी — एक रस्ता एकदाच काँक्रीट करते, पण वारंवार खोदते', अशा शब्दांत नागरिकांनी सोशल मीडियावर टीका करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
ABVP कार्यालया बाहेर केलेलं आंदोलन मनविसेच्या कार्यकर्त्यांना भोवणार
पोलीस करणार मनविसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांकडून सुरू
अकोले येथे शेतकरी आक्रमक...
तहसिलदारांना घातला घेराव...
नुकसानीचे अजूनही पंचनामे नाहीत...
मागील अतिवृष्टीत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...
तहसिलदारामुळे शेतकरी मदतीपासून राहणार वंचित.. शेतकऱ्यांचा आरोप...
माजी आमदार वैभव पिचड आणि तहसीलदार यांच्यात शाब्दिक खडाजंगी..
शेतकऱ्यांनी तहसीलदारांना धरले धारेवर...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. “जिथे शक्य तिथे युती केली पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले. निवडणुकीसंदर्भात सध्या आढावा बैठक सुरू असून, स्थानिक पातळीवर शक्य त्या ठिकाणी युतीबाबत निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
चाकण वरून चेन्नई करिता निघालेला इंडस्ट्रीयल मटेरियलचा माल घेऊन चाललेला कंटेनर खेडशिवापूर येथील कोंढणपूर ब्रीज जवळ असताना पेट घेतल्याने ड्रायव्हरने कंटेनर हा सर्विस रोड ला असलेला वॉशिंग सेंटर येथे आग विझवण्यासाठी नेऊन उभा केला सदर घटना समोरील खेडशिवापूर येथील राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेली खेड शिवापुर दूरक्षेत्र येथील असलेला पोलीस स्टाफ महिला पोलीस हवालदार निकम व ट्रॅफिक आमलदार पोलीस कॉन्स्टेबल राऊत व पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे यांनी समक्ष पहिले तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी अग्निशमन बल यांना बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे सदर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही
घाटकोपरच्या गोल्ड क्रश इमारतीला आग
काही लोक या इमारतीत अडकल्याची माहिती
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
लातूरच्या चाटा शिवारात शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना कोयता आणि लाट्याकट्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादाय घटना घडली आहे, यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर याप्रकरणी मुरुड पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्याची जखमी व्यक्तीने दिली आहे..
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. बँकेच्या भरती प्रकरणात मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर यावर भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.ही आनंदाची गोष्ट आहे खूप चांगली दिवाळीच्या तोंडावर GST प्रमाणे ही बातमी चांगली आहे.
सामान्य लोकांचे शोषण होण्यापासून मुख्यमंत्र्यांनी रोखलं ही मोठी बातमी आहे आम्हा सर्वांसाठी.
पेपर मधल्या बातम्या प्रमाणे जो भ्रष्टाचार दिसत होता, त्याला रोखण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलय, त्याबद्दल राज्य सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले.
धाराशिव च्या परंडा तालुक्यातील वागेगव्हाण या पुरग्रस्त गाव परीसराची आमदार प्रविण दरेकर यांनी पाहणी केली.उजणी धरनातून बोगद्यातून सोडण्यात येणारं पाणी वागेगव्हाण येथील बंधाऱ्यात अडवले जाते.त्यामुळे परंडा व माढा तालुक्यातील 15 ते 20 गावांना याचा फायदा होतो.परंतु तो बंधारा सीना नदीच्या महापुरात वाहून गेल्याने याचा फटका या गावांना बसणार आहे.त्यामुळे लवकरात लवकर हा बंधारा दुरुस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी दरेकरांकडे केली आहे.
* नाशिक मध्ये आदिवासींचा आज उलगुलान मोर्चा
* नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
* आदिवासींच्या आरक्षणातून धनगरांना आणि बजारांना आरक्षण देऊ नये अशी मागणी
* देशात हैदराबाद गॅझेट नव्हे तर संविधानाचं राज्य.
* सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या
* धनगरांना आदिवासी मधून आरक्षण दिल्यास मुंबईला जाणारे पाणी रोखू
* मुंबईच्या दिशेने जाणारे रेल्वे ट्रॅक देखील उखडून टाकू
* आदिवासी गुलगुलान मोर्चा सरकारला जाहीर इशारा..
गौतमी पाटील च्या चालकाने केलेल्या अपघाताचा विषय गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण पुण्यासह राज्यात गाजला. आता गौतमी पाटील वर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुण्यातील एका वकिलाने केली आहे. गौतमी पाटील यांना नोटीस पाठवून देखील हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी या वकिलाने केली आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यातील वकील वाजिद खान बिडकर ने केली आहे.
कायद्यानं गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होऊ शकतो. गौतमी पाटीलने मानलेले भाऊ अपघात ग्रस्त कुटुंबाकडे मदती साठी पाठवल्याने सरकारी कामात अडथळा आणला आहे गुन्हा दाखल झाल्यावर फिर्यादीकडे अशी माणसं पाठवता येत नाहीत अशी प्रतिक्रिया या वकिलाने केली आहे..
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक घटना
दोन वेगवेगळ्या घटनेत दोन मेल एक्सप्रेसवर दगडफेक
कोयना एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर दगड मारण्याची घटना
दगड फेकीत कोणत्याही प्रवाशाला इजा नाही
कल्याण जीआरपी आणि आरपीएफने सुरू केला आरोपीचा शोध
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे पडघम वाजू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहे. प्रत्येक पक्ष हा निवडणुकीच्या तयारीला लागलेला दिसून येत आहे. भाजपने ही जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.देशात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडुणीत बाजी मारण्यासाठी रणनीती आखण्यात सुरुवात केली आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक ही भाजप साठी महत्वाची आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली हा बाल्लेकिल्ला मानला जातो आणि हा गड राखण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
देशात एकजुटीच सरकार असणं गरजेचं आहे. दिल्ली मध्ये पारदर्शकता आहे राज्यामध्ये पारदर्शक आली पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर पारदर्शकता आणायचे असेल तर आपल्याला भाजप पक्ष सशक्त केला गेला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली नजदीक पिसवली या गावात माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी केले.
येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना सशक्त भारत बनवायचा असेल पुढच्या पिढीसाठी आपल्या घरातील असणाऱ्या युवकांसाठी मुलांसाठी स्वतःच्या भल्यासाठी सशक्त भाजपा बनवणे अत्यंत महत्त्वाचा आहे असा आवाहन त्यांनी नागरिकांना केले
जळगाव च्या चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी आज औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांचा रस्ता अडवून जोरदार आंदोलन छेडले. एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन संपादनाला विरोध दर्शवित शेतकऱ्यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
एमआयडीसीसाठी चिंचोली परिसरातील तब्बल 268 हेक्टर शेतीजमिनींचे संपादन करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.जमिनी मोजण्यासाठी आलेल्या महसूल आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांनी घेराव घालत कामाला विरोध केला. ‘आमची शेती आमचं आयुष्य आहे’, ‘जमिनीशिवाय आम्ही जगायचं कसं?’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी केली. परिस्थिती ताणतणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. “सरकारने आमच्या जमिनी घेतल्या तर आमच्या मुलांना खायचं काय? आमच्या पिढीजात जमिनी हिरावून घेतल्यास आम्ही उद्ध्वस्त होऊ. उद्योगासाठी जमीन द्या, पण आमच्या पोटाची जमीन नाही.”
दरम्यान, प्रशासनाकडून जमिनीचे मोजमाप करण्याचा प्रयत्न झाला असला तरी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते काम थांबवण्यात आले आहे.
वर्ध्याच्या आठ तालुक्यातील 52 जिल्हा परिषद व 104 पंचायत समितीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आलीय. जिल्हाधिकारी कार्यालयात 52 जिल्हा परिषद तर तालुक्याच्या ठिकाणी 104 पंचायत समितीकरिता आरक्षण काढण्यात आलं. आरक्षण सोडतीत अनेक परंपरागत मतदार संघ बदलल्याने चांगलीच अडचण झाली आहे. तर दुसरीकडे नवख्या उमेदवारांना संधी मिळणार असल्यानं समाधान व्यक्त केल्या जात आहे. आरक्षण सोडतीमुळे अनेकांचं गणितं बदलणार आहे.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचे घर उद्ध्वस्त झाली. अनेकांचे गृह उपयोगी साहित्य पूर्णतः निकामी झाल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले. या पूरग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या तर्फे तर्फे आज धाराशिव साठी तीन ट्रक अन्नधान्य व किराणा साहित्य पाठवण्यात आले याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवली व हे तीन ट्रक धाराशिवच्या दिशेने रवाना केले.
नंदुरबारचे सुपुत्र आणि अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी उद्या बांधणार शिवबंधन.....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिरीष चौधरी यांच्या शिवसेनेत होणारा प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेला उधान...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेश....
उद्या मुंबईतील एकनाथ शिंदेच्या निवास्थानी पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा....
माजी आमदार यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दिला, आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्यात निर्णय घेतला घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू....
अमळनेर येथील 25 आजी माजी नगरसेवक, नंदुरबार येथील 20 माजी नगरसेवक, 100 सरपंच तसेच कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत करणार प्रवेश....
आसनगाव येथील एस के आय कंपनी ला भिषण आग शहापूर तालुक्यातील आसनगाव औद्योगिक विकास संकुल मधील एस के आय प्लॅस्टिक कंपनी
ला भिषण आग लागली असून शहापूर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाली आहे.
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. क़पनीत प्लॅस्टिकचे वस्तू बनविले जात होते
गेल्या आडीच तासांपासून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
10 दहा खाजगी टँकर व दोन अग्निशामक दलाच्या गाड्या हा घटना सली दाखल होऊन आग योजनेचा सतीचा प्रयत्न करीत आहेत आग एवढी भीषण आहे की या योजनेसाठी आणखीन काही तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत
कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितींसाठी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्या उपस्थितीत ही सोडत सुरू झाली आहे. पंचायत समिती सभापतिपदा साठी ही जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे ठरविणार्या या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघाच्या रचनेवरून चर्चांना उधाण आले होते. आता आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या सोडतीस लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे. सभापतिपदासाठी सोडत जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, कागल, गगनबावडा आणि शिरोळ या 12 पंचायत समिती सभापतिपदासाठी देखील आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येत आहे.
संजय राऊत यांची तब्येत बिघडली
काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये केली होते रक्त तपासणी
भांडुप मधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत अॅडमिट
एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी, धनगर आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, या मागणीसाठी आज लातूर-सोलापूर महामार्गावरच्या औसा टी पॉईंट येथे मल्हार रक्षक संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर पंचवीस वर्षापासून धनगर समाज रस्त्यावरची लढाई लढतोय, इतर राज्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे. त्याच धर्तीवर राज्यातही धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
देशातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि लेह लदाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे. कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. हातात लालबावटे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. भाजप केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांना जाणीवपूर्वक अटक केली असून ते सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्परावपेठ या दुर्गम भागातील तरुणाचे 3 ऑक्टोबर रोजी दुबईत निधन झाले होते. श्याम अंगरवार वय 28 वर्ष असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी तो मजुरी करण्यासाठी दुबई इथ गेला होता. तिथं त्याचा आजारी पडून मृत्यू झाला. त्याच्या परिवारातील सदस्य हे शेतमजुरी करत असल्याने मृतदेह गावी परत कसा आणायचा या विवंचनेत ते होते. दरम्यान आमदार भीमराव केराम यांनी ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली त्यानंतर सूत्र हलली अन् मयत तरुणाचा मृतदेह 12 ऑक्टोबर रोजी मूळ गावी आणण्यात आला. आमदार भीमराव केराम व सरकारने लक्ष घातल्यामुळे कुटुंबीयांना मुलाचे शेवटचे दर्शन झाले.
आगामी महापालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये निर्माण झाली दुफळी
भाजप शहराध्यक्ष आणि आमदारांमधले वाद संघटन मंत्र्यांच्या कोर्टात
भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी संघटन मंत्री राजेश पांडे यांना पत्र लिहीत भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरुद्ध केली तक्रार
सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयकुमार देशमुख हे कोणत्याही पद्धतीचे सहकार्याने करत नसल्याचा करण्यात आला आहे आरोप
पक्षाने दिलेले कोणतेही कार्यक्रम उत्तर विधानसभा मतदार संघातील नगरसेवक राबवत नाहीत
पक्षाने परवानगी दिली तर आम्ही त्याठिकाणी सक्षमपणे यंत्रणा उभी करून आगामी निवडणुकीत भाजपाची सत्ता आणू
शहर उत्तर मधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करुन दुसरे पदाधिकारी नेमवेत
अशी मागणी भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी संघटना मंत्री राजेश पांडे यांच्याकडे केली आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील नाणेकरवाडीत रिक्षाला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि “आम्ही संपलेलो नाही” असा संदेश देत रिलच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांना चाकण पोलिसांनी चांगली अद्दल घडवली आहे. जिथं दहशत केली तिथंच आरोपींची धिंड काढत पोलिसांनी चाकण औद्योगिक क्षेत्रात अॅक्शन मोड दाखवला आहे.
रविवारी दुपारी मालवाहक ट्रक दरीत कोसळून अपघात
सिंहगड घाटातुन आलेला मालवाहतूक करणारा आयशर ट्रक येथील ११ हजार पॉइंट वरून खोल दरीत कोसळला
सुदैवाने या अपघातात चालक बचावलला
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक घाटातील सर्वात धोकादायक वळणावरुन खाली खोल दरीत कोसळला असल्याची माहिती
अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन
सिंहगड घाटातुन क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडुन परिवहन विभाग व पोलीस तपास टाळण्यासाठीच सिंहगड घाटरस्ता वापरण्याची शक्कल लढवली जाऊ लागल्याने पर्यटकांसाठी हा घाट मार्ग आता असुरक्षित ठरू लागला आहे
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत सकल हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न होतोय.. काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार असून वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची नोटीस आल्यानंतर आमदार जगताप आज काय भूमिका मांडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.. घारगाव येथे काही दिवसांपूर्वी आदिवासी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
युती होवो अथवा न होवो ,याल तर तुमच्यासह
नाही आलात तर आडवे करू..शिवसेना जिल्हा
प्रमुख अरविंद मोरे भाजपला आव्हान ,व्हिडियो व्हायरल
- रॅप सॉंग तयार करत सोशल मिडीयात व्हायरल करून समाजात माजवली दहशत
- पवन पवार फरार, पोलीसांकडून शोध सुरू
- पवन पवार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अनेक गंभीर गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद
चारचाकी वाहनामध्ये डांबून एका तरुणाला अमानुषपणे बेदम मारहाण करून भाईगिरी करीत दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित असलेल्या दादा लोकांची शेगाव शहर पोलिसांनी रात्री शेगावात धिंड काढली. ताडी परिसरात काही युवक भाईगिरी करून दहशत पसरवीत होते. त्यांच्याकडून गुन्हे देखील घडलेले आहेत. हा प्रकार थांबून भाईगिरी संपुष्टात आली पाहिजे. तसेच दहशत पसरविणाऱ्या युवकांवर अंकुश लागला पाहिजे. यासाठी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन पाटील यांनी नुकत्याच गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींची शहरातून दिंड काढली आहे. आरोपीने एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती. यासंदर्भात पिडीत युवकाच्या पत्नीने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या पतीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवुन लाकडी काठी व पट्टयाने बेदम मारहाण केल्याची घटना जगदंबा चौक परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव, प्रमोद जाधव, रोहन चौके, अक्षय चौके व ईतर ३ ते ४ लोक सर्व रा. शेगाव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली आहे. एव्हडेच नव्हे तर भर चौकात कान् पकडून माफी शुद्ध मागायला लावली.
आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. नक्षीदार पणत्या आणि गृह सजावटीचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहेत. शंभर रुपयापासून ते हजार रुपये पर्यंत दिवाळीच्या पणत्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. मातीच्या पणत्या रंगबेरंगी डिझाईन्स, हस्तनिर्मित, आकर्षक नक्षीकाम असलेल्या विविध पणत्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश अशा विविध भागातून नांदेड शहरात पणत्या दाखल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पण त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग निहाय मतदार याद्यामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. अनेक मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभागाऐवजी इतरत्र गेल्याने मतदार त्रस्त झाले आहे. भोकरदन नगरपरिषदेचा प्रारूप मतदार यादीमध्ये ही माहिती समोर आली असून आतापर्यंत 650 पेक्षा अधिक मतदारांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहे.दरम्यान ही चूक नगरपरिषद प्रशासनाची नसून याला संबंधित बीएलओ जबाबदार आहे. ज्या नागरिकांची नावे त्यांच्या प्रभागा व्यतिरिक्त नोंदवली आहेत त्यांच्या तक्रारी बघून घटनास्थळी जाऊन पंचनामा करून कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे..
- नागपूर जिल्ह्याचा हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ...
- वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकाच घरात तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार,
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध यादीत घोळ आला समोर...य
- या तपासणीत वानाडोंगरी शहरातील राजीव नगर (सरोदीपुरा) प्रभाग क्रमांक ५ मध्ये एकाच घर क्रमांक १ मध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार राहात असल्याचे दाखविण्यात आले आहे.
- यासोबतच एकाच आडनावाचे तब्बल २७ व्यक्ती सुद्धा एकाच घरात राहात असल्याचे यादीमुळे समोर आले आहे.
- राज्य निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मुंबई येथील लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आलय.पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे हे प्रचंड नुकसान झाल्याने सामाजिक बांधिलकीची जपणूक करत लालबागचा राजा कडून वह्या,स्कुल बॅग,पाणी बॉटल,टी शर्ट,कंपासपेटी ह्या साहित्याचे 1800 कीट्स चे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
सावंतवाडी वेत्ये गावातील कलेश्वर मंदिरलगत असलेल्या ओढ्यात तब्बल 12 फुट लांब महाकाय मगरीला जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने या मगरीला जेरबंद केले. गेले काही दिवस अत्यंत धोकादायक बनलेली ही मगर वेत्ये परिसरात फिरताना दिसून येत होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली होती.
- नाशिकच्या ओझरमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये स्वदेशी तेजस लढाऊ विमानांच्या बांधणीच काम अंतिम टप्प्यात आलं असून शुक्रवारी स्वदेशी तेजस लढाऊ विमान वायुदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. याआधी HAL मध्येच सुखोई एमकेआय ३० या ३०० लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आलीय. सध्या याच सुखोई
विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं काम HAL मध्ये केलं जात असून संरक्षण खात्याने तेजस या लढाऊ विमानांच्या बांधणीचं काम देखील HAL ला दिलं होतं. त्यासाठी स्वतंत्र प्रोडक्शन लाईन देखील HAL मध्ये टाकण्यात आली होती. मागील दीड वर्षांपासून तेजसच्या निर्मितीचे काम या ठिकाणी सुरू होतं. आता शुक्रवारी स्वदेशी तेजस वायुदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार पक्षाची बैठक
सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व आमदार आणि खासदार यांच्यासह जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार
निवडणुकीच्या तोंडावर पक्षात महत्वाचे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता
आमदार रोहित पाटलांच्या नावाची युवक अध्यक्षपदासाठी चर्चा, सध्या ही जबाबदारी मेहबूब शेख यांच्याकडे
अंबरनाथच्या खुंटवली परिसरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या पुढाकारातून ४ हजार नागरिकांना अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्याचं वाटप करण्यात आलं. या कीटमध्ये रवा, मैदा, साखर, पोहे, डाळ, तेल, शेंगदाणे, दलिया आणि चिवडा मसाला असा ४२८ रुपयांचा फराळ संच दिला गेला. मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांची दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेना करत आहे. “नागरिकांचा आनंद हाच आमचा आनंद,” असं मनीषा वाळेकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बहुप्रतीक्षित ५२ गट व १०४ गणांच्या आरक्षण सोडतीमुळे कोणत्या गट-गणात कोण राहणार आणि कोण विस्थापित होणार याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या आरक्षणानंतर ग्रामीण भागात राजकीय धुरळा उडणार आहे. यात जिल्हा परिषदेचे एकूण ५२ गट आहेत. नामाप्र (ओबीसी) साठी १४, एससी ११ व एसटी प्रवर्गासाठी ४ गट राखीव राहिल्यानंतर २३ गट खुले (सर्वसाधारण) राहतील. प्रमुख पक्षांत इच्छुकांची मोठी यादी असल्याने तिकीट कोणाला द्यावयाचे आणि वेटिंगवर कोणाचे ठेवायचे, याचा निर्णय घेताना पक्ष नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव या दोन समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यु फ्लॅग नामांकन मिळाले आहे. ISO नामांकना प्रमाणे हि प्रणाली आसून राज्यातील 12 समुद्र किनाऱ्यांचे ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी अर्ज गेले होते त्यापैकी या पाच किनाऱ्यांना पायलट म्हणून संधी मिळाली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्र किनांऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थेमार्फत हे मानांकन दिले जाते. निकषपूर्तीनंतर हे किनारे जागतिक पातळीवरील आदर्श समुद्र किनारे म्हणून समोर येतील. जागतील दर्जाचे हे नामांकन मिळाल्याने पर्यटन वृध्दीच्या आशा पल्लवीत झाल्या असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याच्या दीड एकर शेतात लागवड केलेले मका पीक अतिवृष्टीने हातचे गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास आत्महत्या लावून केल्याची घटना घडली.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली महसूल विभागाची कार्यपद्धती आता राज्यभरात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. १५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील पारदर्शकता, आणि उत्तरदायित्व समन्वय वाढविण्यासाठी एक परिपत्रक काढून सर्वांना प्रशिक्षित केले. ती कार्यपद्धती शासनाने अवलंबविल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कार्यपद्धतीमुळे संचिकांचा प्रवास वेगवान झाला, तक्रारींचे निवारण जलद झाले. लोकाभिमुख प्रशासन असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरणाचा अध्यादेश शासनाने १० ऑक्टोबर रोजी काढला. त्यानुसार सजा चावडीमध्ये ग्राम महसूल अधिकारी व मंडळ कार्यालयातील उपस्थिती व कामकाजाच्या वेळेबाबत मंडळ अधिकारी कडक पर्यवेक्षण करावे लागणार आहे. ६ महिन्यांत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी अध्यादेशातील सूचनेनुसार आढावा घेतील. तसेच प्रत्येक मंडळ कार्यालयाला आपले सरकार केंद्र मंजूर करतील. मंडळ कार्यालयातील उपस्थितीचे दिवस निश्चित करावे लागतील असे सांगण्यात आले आहे.
भाजप नेते, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या प्रचारसभेतून निलेश घायवळ यांचे रोहित पवार यांच्यावर टीका करणारे भाषण समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. आपल्या भाषणात निलेश घायवळ यांनी, रोहित पवार दादा म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, असे स्पष्टपणे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निलेश घायवळ यांनी रोहित पवारांवर वडीलधाऱ्यांची आणि शेतकरी बांधवांची काळजी न घेतल्याचा तसेच त्यांचा मान-सन्मान न राखल्याचा आरोप केला.
“जो आपल्या वडीलधाऱ्यांची किंमत करत नाही, त्याला दादा म्हणू नये,” असे घायवळ यांनी म्हटले. घायवळ यांच्या मते, दादा ही संज्ञा घरातल्या कर्त्या पुरुषासाठी किंवा मोठ्या भावासाठी वापरली जाते, जो सर्वांची काळजी घेतो. रोहित पवार हे या व्याख्येत बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या व्हायरल भाषणासोबतच, राम शिंदेंच्या पाया पडताना निलेश घायवळ यांचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निलेश घायवळ आणि रोहित पवार यांच्यातील शाब्दिक वाद चर्चेचा विषय बनला आहे. हे प्रकरण महाराष्ट्र राजकारणातील ताज्या घडामोडींचा भाग असून, यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांना कापूस विक्रीपूर्वी कपास किसान ॲपवर नोंद करण्याचे आदेश सीसीआय ने काढले असून शेतकऱ्यांनी या अॅपवर नोंद केल्यानंतर कापूस विक्रीपूर्वी बाजार समित्यांना त्याचे अप्रुव्हल द्यावे लागणार आहे हे अप्रुव्हल देण्यासाठी पणन विभागाने बाजार समितींना युजर आयडी दिला आहे ही प्रक्रिया राबविल्यानंतर कापूस विक्रीला आणल्यानंतर उलट तपासणी होणार आहे.
आगामी पैठण नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवाराचेच नाव नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीतून वगळण्यात आले आहे. नाव वगळणे किंवा स्थलांतरासाठी आपण कोणताही अर्ज केलेला नसतानाही नाव वगळण्यात आल्याचा आरोप तक्रारदार तथा इच्छुक उमेदवार अजय नाथप्रसाद पोरवाल यांनी केला आहे. अजय पोरवाल आणि त्यांची पत्नी प्रिया पोरवाल यांचे नावे यादीतुन गायब झाल्याबाबात त्यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला आसता ज्यांची नावे गहाळ झाली असतील त्यांनी नगरपालिकेकडे संपर्क साधावा असं आवाहन मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी केले आहे.
कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याची औषध घेतल्या नंतर मृत्यू
खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक प्रकृती बिघडली, यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर केल्यानंतर झाला मृत्यू , तपासणी अहवालाची प्रतीक्षा
मेडिकलच्या औषधांची तपासणी, मध्यप्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कप सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले
संवेदनशील प्रकरण असल्याने त्या बाळाची शवचिकित्सा करण्यात आली, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मेडिकल प्रशासनाने याची माहिती सहाय्यक आयुक्त औषधी यांना दिली
अन्न व औषध विभागाकडून मेडिकल मधून पाच औषधाचे घेतले नमुने, अहवालाची प्रतीक्षा
रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकांच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वपूर्ण मानला जात आहे. रायगड जिल्हा परीषदेच्या 59 आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या 118 सदस्यपदांची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. या निवडणूका लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांचे भवितव्य या आरक्षण सोडतीतून ठरणार असल्यामुळे आजच्या सोडतीकडे राजकीय पक्षांबरोबरच इच्छुक उमेदवारांचे लक्ष देखील आजच्या या सोडतीकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका घेण्याच्या कामाला निवडणूक आयोग लागले आहे. सर्वात आधी जिल्हा परीषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले त्यानंतर पंचायत समिती सभापतीपदांची सोडत काढण्यात आली होती. जिल्हापरीषदेची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीची सोडत त्या त्या तालुक्यात काढण्यात येईल.
सांगलीच्या चांदोली परिसरातील बफर झोन परिसरातील मानवी वस्तीत अजगाराचे मोठ साम्राज बनले आहे.. परिसारातील मणदूर येथील वारणावती वसाहती मध्ये मोठ्या प्रणामात अजगाराचे साम्राज्य दिसुन येत आहे. गेल्या वर्षभरात पाच ते सहा वेळा वेगवेगळ्या प्रकारे रेस्क्यू करण्यात आले आहे. तर रात्री वारणावती येथील बस स्थानाकाजवळील एका टेलर्सच्या दुकानाजवळ भला मोठा अजगर रेसक्यु करण्यात आले.. साधरणाता २५ ते ३० किलो वजनाचा अजगर होता. तर त्याच ठिकाणी दुसरा एक घोणस जातीचा सर्पही होता. मात्र घोणस सर्प अंधारात गायब झाला.. त्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे. मात्र अजगरावरा लक्ष ठेऊन असलेल्या नागरिकांनी येथील स्थानिक नागरिक व प्लॅनेट अर्थ फाउंडेशन शिराळा यांचे संयोगी स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीने त्याचे रेस्क्यू करण्यात आले. यामध्ये बघ्याची तोबा गर्दी जमली होती. अजगराला सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले.
खासगी बसचालकांनी मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारले तर प्रवाशांना करता येणार तक्रार
नागरिकांना ८२७५३३०१०१ क्रमांकावर अथवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार करता येणार
नागरिकांनी तक्रार करताना आपले नाव, मोबाईल क्रमांक, तिकिटाचे फोटो अशी माहिती पाठवावी, आरटीओकडून आवाहन
जादा तिकीट दर आकारले तर बसचालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे
दिवाळीच्या काळात खासगी बसचालकांनी तिकिटामध्ये मोठी वाढ केल्याचे चित्र आहे. याबाबत आरटीओकडे तक्रारीदेखील येत आहेत
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळी येथे भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची गावकऱ्यांची माहिती.
भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर मात्र आवाजाची किंवा धक्क्याची कुठलीही नोंद आढळली नाही.
अफवावर विश्वास ठेवू नये परत आवाज आला तर घराजवळ मोकळ्या जागेत थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन.
इजिप्तच्या शर्म-एल शेख येथे सोमवारी होणाऱ्या ‘गाझा शांतता शिखर परिषदे’त परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले. मात्र परराष्ट्र राज्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
इजिप्तच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘शांतता शिखर परिषद सोमवारी शर्म अल शेख येथे होणार आहे. या शिखर परिषदेचे अध्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष सिसी असतील. या परिषदेला २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गाझा पट्ट्यातील युद्ध संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट या परिषदेचे आहे. पश्चिम आशियात दीर्घ काळ शांतता राहण्यासाठी परिषदेत मंथन होईल. प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेच्या नव्या संधी या परिषदेमुळे खुल्या होतील.’
मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गावोगावी कार्यकर्ता संवाद यात्रेच्या निमित्ताने मावळचे आमदार सुनील शेळके आणि तालुक्याचे अध्यक्ष गणेश खांडगे सर्व तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर मावळातील एकही जागा महायुतीला देणार नाही. असे ठणकावून त्यांनी नाणे मावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संवाद यात्रेत सांगितले आहे... दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कसा असावा यावरही त्यांनी प्रकाश टाकला. आपल्या भागातील सर्व माहिती जर त्या उमेदवाराला नसेल तर मीच त्याची तिकीट कापेल असा सज्जन दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरला.... भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तळेगाव नगरपरिषद मध्ये पाच वर्ष फिरकले नाही. ते आता म्हणायाला लागले लागा तयारीला. आता थांबायचं नाही . आमचा दहा नंबर वार्ड फिक्स आहे 12 नंबर 13 नंबर फिक्स आहे. एवढ्या जर तुमच्या जागा फिक्स झाल्या आणि काम मात्र काहीच नाही. मी नगरपरिषद मध्ये जाऊन सांगणार आहे. जाच काम असेल तर याला निवडून द्या अन्यथा घरी बसवा. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तळेगाव, वडगाव, लोणावळा, या मधली उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार. विरोधकांना आमदार शेळके यांनी ठणकावून सांगितले पाडव्यापर्यंत तुमचा आणि आमचा संबंध, नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने जावे आम्ही आमच्या मार्गाने जाणार.. मात्र नाणे मावळतील जनतेला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसची एकही जागा मी दुसऱ्या पक्षाला देणार नाही. युती झाली नाही तरीही चालेल. आणि पंचायत समितीला ही एकही जागा मी दुसऱ्या पक्षाला देणार नाही. आणि मी छाती ठोकून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचा पहिला सभापती नानेमावळचाच होईल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.