आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोध चिन्हाचं आज अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अधिकृत बोधचिन्हाचं अनावरण करण्यात येणार
मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर सकाळी ११.३० वाजता बोध चिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जागतिक ओळखीचे प्रतीक ठरणाऱ्या या बोध चिन्हाचं अनावरण साधू, महंत, आखाड्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार
कार्यक्रमासाठी साधू, महंत आणि आखाड्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण
अनावरण सोहळ्यानंतर बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना धनादेशाचे वितरण करण्यात येणार
नाशिक मधून अटक केलेल्या तरुणाचा एक साथीदार पुण्यात असल्याची शक्यता
पुणे पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू
संबंधित तरुण हा मूळचा अहिल्यानगर येथील असल्याची माहिती
मंगळवार दुपारपासून संबंधित तरुणाचा मोबाईल बंद असल्याची पोलिस सूत्रांची माहिती
नाशिक मधील आरोपी खैरनार याच्यासोबत असलेला आणखी एक तरुण हा पुण्याचा असण्याची शक्यता
पुणे पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध सुरू
नसरापूर प्रकरणात येत्या १ ते २ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणार
नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाची नियुक्ती करण्यात येणार
खटल्याची सुनावणी तात्काळ सुरू करून याप्रकरणी न्याय निवाडा लवकर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न
पुणे ग्रामीण पोलिसांकडून संबंधित तपास जवळपास पूर्ण
नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे ची १४ दिवसांची पोलिस कोठडी उद्या संपणार
याप्रकरणात राज्य सरकारने नुकतीच अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे
NEET पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनार CBI च्या अटकेत
नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना
रात्री उशिरापर्यंत CBI कडून आरोपीची कसून चौकशी
आरोपीच्या पेपरफुटी रॅकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचा फोकस
स्थानिक तपासानंतर आता CBI कडून देशव्यापी लिंकचा शोध सुरू
शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता
धाराशिव तालुक्यातील आंबेहोळ येथील शेतकरी आणि एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या विजय कांबळे यांनी गेल्यावर्षी चार एकरवरील केसर आंब्याच्या बागेतील आंबा परदेशात ओमान मध्ये एक्सपोर्ट केला त्यातून त्यांना चार लाखाचे उत्पादन मिळाले होते.मात्र यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका या आंबा उत्पादक शेतकऱ्याला बसल्याने आंब्याच्या उत्पादनात 80 टक्के घट झाली.त्यामुळे आंबा एक्सपोर्ट करता आला नाही.शेतात निघालेला आंबा घरोघरी जाऊन विकण्याची वेळ या आंबा उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.
आखाती देशात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन वाचवण्यासाठी केलेल आवाहन याचा कुठेतरी नागरिकांना विसर पडत असल्याचे दिसतय.. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे नागरिकांनी पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांवर धाव घेतली आहे. आणि अशा ठिकाणी जाताना नागरिक स्वतःची कार किंवा स्वतःच्या वाहनाने पोहोचत आहे त्यामुळे पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळी आपल्याला हजारो वाहने बघायला मिळत आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भावी घेत आहेत
यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाच्या समित्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीत राजकीय हालचालींना वेग आलाय जागा वाटपासाठी ५०-३०-२० चा फार्मूला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा नियोजन समिती,अभ्यागत समितीसह तब्बल सहा महत्त्वाच्या समित्या वरील नियुक्तीसाठी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली असून जागा वाटपाचे प्राथमिक गणित निश्चित झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात खरिप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले,यावरून भाजप आणि शिवसेना शिंदेगट आमने सामने आले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 134 कोटी रूपयांचा पीकविमा उतरविला.तरी देखील पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले यवतमाळात सोयाबीन पीकविम्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात संघर्ष पेटला असून पालकमंत्र्यांविरोधात भाजप आक्रमक झाली असून तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार.या मुद्द्यावर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.
अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाटेचा इशारा. नागपूर हवामान विभागाचा वर्तविला इशारा. नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे 13 ते 16 मे दरम्यान अकोला जिल्ह्यात तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता. काल (मंगळवारी) अकोल्यात 45.6° अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर सोमवारी नोंदवल्या गेलंये 45.1 अंश सेल्सिअस तापमान. दरम्यान, अकोलेकरांना दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, प्रशासनाकडून आवाहन. दरम्यान, अकोला जिल्ह्यात
नवी मुंबई महापालिकेच्या कामाची माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष यांनी पोलखोल केली आहे. सिवूडसमध्ये गरज नसताना देखील चुकीच्या पद्धतीने गटाराची कामं केली आहेत. तसेच उद्यान विभागात टाकण्यात आलेल्या मातीची रॉयलिटी भरली नाही तसेच शहरात बसवणायत आलेल्या कचरा कुंड्या यात कागदावरील व प्रत्यक्षात बसवण्यात आलेल्या कुंड्या यात जवळपास 34 ते 35 कुंड्यांची तफावत असल्याच भरत जाधव शासन दरबारी मांडलं आहे. .. तसेंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील घ्यायची मागणी जाधव यांनी केलीय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.