Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगेचं उपोषण, राज्यात पावसाची उघडीप, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पारोळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; खेडीढोक येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपीला जेरबंद करत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेला आहे. अनेक भागांत पावसाअभावी उभी पिके करपू लागली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराच्या कष्टाची राख होताना दिसत आहे.

भुलेश्वरनंतर कुर्ल्यातही गणेश मूर्ती कोसळली! नेमकं काय घडलं?

मुंबईत गणेशमूर्ती कोसळण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. भुलेश्वरच्या राजापाठोपाठ कुर्ल्यातही गणेशमूर्ती कोसळली. कुर्ल्यातील प्रेमनगरचा राजा गणेशमूर्ती वाजतगाजत आणत असताना स्पीड ब्रेकरवरून मूर्तीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले आहेत.

मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे विज मीटर तपासणीचे शासकीय काम सुरू असताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.. मारहाणीचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला असून, मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. धांदरफळ बुद्रुक येथील प्रदीप इंजिनिअर वर्क्स या दुकानात मीटर तपासणीचे काम सुरू असताना, महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली..

अमरावतीच्या दर्यापूर परिसरात 40 दिवसांपासून पावसाने मारली दांडी कपाशी पिके संकटात

अमरावतीच्या दर्यापूर परिसरामध्ये गेल्या 40 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी , सोयाबीन तूर,पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी आरळा, नायगाव या परिसरात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकरिता हजारो रुपये खर्च केले आहेत. खत बी बियाणे, फवारणी करून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे परंतु गेल्या 40 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे .त्यामुळे सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी बांधवांच्या वतीने केली जात आहे.

बैलपोळा सणावर कोरड्या दुष्काळाचे सावट..

पोळा... हा सण म्हणजे केवळ सण नाही, तर बळीराजाचा आपल्या सर्जा- राजाप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस .. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि त्यांच्या कामाचा शिणभाग दूर करण्यासाठी शेतकरी हा सण अत्यंत आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा करतात.. मात्र, यावर्षी पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे कोरड्या दुष्काळाचे पोळा सणावर सावट असतानाही, शेतकऱ्यांचे मध्ये उत्साह आहे .. पोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत.. पिके सुकत असताना शेतकऱ्यांसमोर बैलपोळ्याचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला..

पाऊस लांबल्याने खरीप हंगाम संकटात आला

राज्यात पाऊस लांबल्याने खरीप हंगाम संकटात आलाय. दुबार-तिबार पेरणी आणि आता पावसाचा खंड.. 40 दिवस झाले पावसाचा एक थेंब नाहीये,.. अशातच विदर्भातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचा खरीप हंगामात संकटात आलाय. मायबाप सरकार मदत करा, शेतकऱ्यांची काळीज चिरणारी मदतीची हाक पाहायला मिळते.. आज अकोल्यातील सर्वांच मनसुन्न करणारा प्रकार समोर आलाय.. आर्थिक संकटात पडलेल्या अकोल्यातील मोरळ गावातील शेतकऱ्यांनी भावुक होतं थेट सोयाबीन पिकांना अग्नी दिलीय.. यावेळी शेतकऱ्यांचा टोहो, आणि आक्रोश पाहायला मिळालाय...

औसा तालुक्यातील शेती पिके करपू लागली; तात्काळ पंचनामे करण्याची छावा संघटनेची मागणी

लातूरच्या औसा तालुक्यात देखील पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकऱ्याने तीन एकर वरील सोयाबीनचं उभं पीक उपटून फेकलं

नांदेड जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. मागील महिनाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. सोयाबीनचे पीक ऐन बहरात असताना मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यावर वरून राजा कोपला. आणि हातात तोंडाशी आलेला घास हिरावला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील सोपान कल्याणकर या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतीमध्ये सोयाबीन पेरलं होतं.

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के

काल रात्री नऊ वाजून 38 मिनिटांनी नेपाळची राजधानी काठमांडू पासून उत्तर पश्चिम परिसरातील मनासलु पर्वत रांगेत 5.0 रिश्चटर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. हा तोच परिसर आहे ज्या परिसरात 26 ऑगस्ट रोजी ग्लेसिअर फुटून महापूर आला होता. त्यामुळे नेपाळ सरकारने या परिसरातून वाहणाऱ्या त्रिशूली व इतर नदीकाठच्या नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष करून नुवाकोट जिल्ह्यातील नागरिकांना पुढील 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नेपाळ सैन्य दलाच्या तुकड्या, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके या परिसरात तळ ठोकून आहेत.

१० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

४ बेस ४ टॉप निर्णय मान्य असून सुद्धा पोलिस कारवाई करत असल्याचा साउंड व्यावसायिकांचा आरोप

पुणे पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती चे पालन केल्यानंतर सुद्धा होते आहे कारवाई

दही हंडी उत्सव दरम्यान अनेक ठिकाणी नियम पाळून सुद्धा साउंड सिस्टिम जप्त केल्याचा व्यावसायिकांचा आरोप

फक्त साउंड सिस्टिम बद्दल का दुःख? साउंड व्यावसायिकांचा प्रश्न

पोलिस प्रशासनाकडून होणाऱ्या जप्तीच्या कारवाई विरोधात व्यावसायिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतुकीचा बोजवारा उडालाय

पाथरी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अखेर मुहूर्त लागला

अनेक वर्षांपासून रखडलेल्या परभणीच्या पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना अखेर मुहूर्त लागला असून या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.आराखड्यात मंजूर असलेल्या कामांना कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ सुरुवात करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात वाढ, 8 हजार 700 रुपयांचा मिळाला उच्चांकी दर

वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दराने पुन्हा उसळी घेतली असून, काल कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 8 हजार 700 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय... गेल्या तीन महिन्यातील हा दर सर्वाधिक आहे. 

कारंजा बाजार समितीत पाच दिवसांपूर्वी तुरीला 8 हजार 425 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात तुरीच्या दरात वाढ होऊन हेच तुरीचे दर आता 8 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत.मात्र,आता मोजक्याच शेतकऱ्यांकडं तूर शिल्लक असूनही,काल कारंजा बाजार समितीत 1 हजार 50 क्विंटल तुरीची आवक झाल्याचं बघायला मिळालं...तुरीच्या दरात येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ञांनी वर्तवलीये.

जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार 12 सप्टेंबरला मुंबईला जाणार

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरू केल आहे. मागील तीन दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही 12 सप्टेंबर रोजी मुंबईला जाणार असा निर्धार पिंपळगाव महादेव येथील मराठा बांधवांनी केला आहे.सरकारवर मराठा समाजाचा रोष आहे. सरकारने रस्ते अडवले काही जरी केलं तरी मुंबईला जाणार असल्याचा इशारा पिंपळगाव महादेव येथील मराठा बांधवांनी दिला आहे.

भिवंडीत संत सेना महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

भिवंडी नाभिक समाज उन्नती मंडळ भिवंडीच्या वतीने मंगळवारी संत सेना महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन कोंबडपाड्यातील गाजेंगी हॉलसमोरील पार्वती मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सत्यनारायणाची महापूजा,भक्त गीते,सत्कार समारंभ ,विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि वह्या वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह भक्तांसाठी रात्री महाप्रसाद (भंडारा) ठेवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

Kidney problems: पायांवर दिसून येणारी 4 लक्षणं सांगतायत की किडनी लवकरच होणारे खराब

SCROLL FOR NEXT