CM Fadnavis Saamtv
महाराष्ट्र

CM Fadnavis: महाराष्ट्राची भाषा मराठीच; भैय्याजी जोशींच्या वादग्रस्त विधानावर CM देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

Maharashtra Budget Session: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bharat Jadhav

महाराष्ट्राची भाषा मराठीच, प्रत्येकाला ही भाषा बोलता आली पाहिजेच, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. विधानसभेत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मराठी भाषेवरून विरोधकांनी सरकाराला प्रश्न केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेच्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटलेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी विधान केलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे पडसाद उमटले. या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचे म्हटलं. विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरसंघचालक यांच्या वक्तव्यावरून प्रश्न केला होता. त्यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. तसेच प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे, असं नाही, असं विधान भैय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या खळबळजनक विधानाने नवा वाद निर्माण झाला. त्यावरून विरोधी पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनीही भाजपवर टीका केली. मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो. कारण मुंबईला कोणतीच भाषा नाहीये. ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?

बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का? मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे,असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला. तर आज विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत प्रश्न केला होता. मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यासाठी मराठी भाषेचा विविध कार्यक्रम करतोय. पण दुसऱ्या बाजुला असं विधान केली जात असल्याने इतर भाषांमध्ये मराठी भाषेचा अपमान होतोय.

मराठी भाषा सर्वांना आली नाही तरी चालेल असं विधान केलं जात असेल सरकारची भूमिका त्यावर काय असा सवाल भास्कर जाधव यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते ऐकून त्याच्यावर मी बोलेन. याच्यावर सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबई, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भैय्याजी जोशी यांचेही काही दुमत नसेल. पण शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे.

काय म्हणाले होते भैय्याजी जोशी

मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. " असं वादग्रस्त वक्तव्य जोशी यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT