water, maharashtra jeevan pradhikaran news Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Jeevan Pradhikaran News : थकीत पाणीपट्टी एकरकमी भरल्यास दंड हाेणार माफ : मजिप्राची याेजना

मजिप्रानं अभय याेजनेस सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : नागरिकांनी थकीत पाणी बिल भरावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अभय योजनेची मुदत वाढविली आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ (ambernath) आणि बदलापूर (badlapur) शहरातील ग्राहकांनी थकीत रक्कम एकरकमी भरल्यास नागरिकांना थकीत रक्कमेवरील दंडातून (fine) सवलत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती मिलिंद बसनगार (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) यांनी दिली. (maharashtra jeevan pradhikaran news)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही शहरांमध्ये मिळून मजीप्राचे ६० हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १६१ कोटी रुपयांची पाणीबिलांची थकबाकी आहे. यापैकी ९४ कोटी रुपये मूळ थकीत रक्कम तर त्यावर ६७ कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे.

ही थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यापूर्वी अभय योजना लागू केली आहे. या योजनेला अद्याप हवा उत्तम प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता या योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास दंड पूर्णपणे माफ केला जाणार आहे. त्यामुळं या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगार यांनी केलं आहे. दरम्यान या आवाहनानंतर आणि अभय योजनेची मुदत वाढवल्यानंतर आता तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी वसूल होते का? हे पाहावं लागेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

त्र्यंबकेश्वर हादरलं! विद्यार्थी 3 दिवसांपासून बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध, शाळेच्या मागच्या बाजूस पाहताच... नाशिकमध्ये काय घडलं?

Shocking: पुणे हादरले! कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, शरीराचे लचके तोडत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT