water, maharashtra jeevan pradhikaran news Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Jeevan Pradhikaran News : थकीत पाणीपट्टी एकरकमी भरल्यास दंड हाेणार माफ : मजिप्राची याेजना

मजिप्रानं अभय याेजनेस सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : नागरिकांनी थकीत पाणी बिल भरावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अभय योजनेची मुदत वाढविली आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ (ambernath) आणि बदलापूर (badlapur) शहरातील ग्राहकांनी थकीत रक्कम एकरकमी भरल्यास नागरिकांना थकीत रक्कमेवरील दंडातून (fine) सवलत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती मिलिंद बसनगार (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) यांनी दिली. (maharashtra jeevan pradhikaran news)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही शहरांमध्ये मिळून मजीप्राचे ६० हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १६१ कोटी रुपयांची पाणीबिलांची थकबाकी आहे. यापैकी ९४ कोटी रुपये मूळ थकीत रक्कम तर त्यावर ६७ कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे.

ही थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यापूर्वी अभय योजना लागू केली आहे. या योजनेला अद्याप हवा उत्तम प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता या योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास दंड पूर्णपणे माफ केला जाणार आहे. त्यामुळं या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगार यांनी केलं आहे. दरम्यान या आवाहनानंतर आणि अभय योजनेची मुदत वाढवल्यानंतर आता तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी वसूल होते का? हे पाहावं लागेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT