Maharashtra HSC Exam 2025 Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra HSC Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! राज्य परीक्षा मंडळाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ

Maharashtra HSC Exam 2025 : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने राज्य परीक्षा मंडळाने अर्जाची मुदत वाढविली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Alisha Khedekar

  • बारावीच्या अर्जाची शेवटची तारीख २० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.

  • बाह्य पद्धतीच्या विद्यार्थ्यांसाठी मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्जाची मुदत १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत आहे. त्यामुळे दि. २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते.

राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची उद्या दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी शेवटची मुदत आहे. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : भाग्याची दारे उघडणार, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

Lawrence Bishnoi Gang : कुख्यात लॉरेन्सचा खेळ खल्लास? बिष्णोई गँग दहशतवादी म्हणून घोषित; कुणी केला घोषणा?

Devendra Fadnavis: हिंसाचारामागील आरोपीला शोधून काढू, कडक कारवाई करू; CM फडणवीसांचा इशारा|VIDEO

IND Vs Pak : भारतीय राष्ट्रगीताचा पाकिस्तानी खेळाडूंकडून अपमान, राष्ट्रगीत सुरु असताना रौफ-आफ्रिदीनं नको ते केलं, पाहा Video

Maharashtra Live News Update: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रावळपाडा पुलाखाली प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT