MLA Y Security News Saam TV
महाराष्ट्र

Shinde Government: सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधींची उधळण; सत्तांतराच्या १०० दिवसांनंतरही बंडखोर आमदारांना Y दर्जाची सुरक्षा कायम

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Aurangabad News: शिवसेना आमदारांनी बंड केले आणि राज्यात शिंदे गट-भाजप महायुतीचं सरकार आलं. बंडखोरी केल्याने शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेल्या शिंदे गटातील सर्व ४० आमदारांना सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. आता शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांना सत्तेत येऊन १०० दिवस लोटले. मात्र, तरीही शिंदे गटातील बंडखोर आमदारांना तेव्हा दिलेली वाय दर्जाची सुरक्षा अजूनही कायम आहे. या सुरक्षेसाठी लागणाऱ्या खर्चाचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतोय. शिवाय पोलिस यंत्रणेवरही ताण येत असताना ही कोट्यावधींची उधळण कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. (MLA Y Security News)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर या महिन्यांच्या १०० दिवसात तब्बल १७ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च झाल्याचं सांगितलं जातंय. तीन महिन्यांनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील ४० पैकी ३१ आमदारांची वाय प्लस सुरक्षा कायम आहे. त्यावर राज्यात २० हजार पोलिसांची पदे रिक्त असताना सण-उत्सव काळात तब्बल १,११६ पोलिस कर्मचारी आमदारांच्या दिमतीला आहेत. (Maharashtra News)

राज्यात ३० जूनपासून अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील ४० आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ९ जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असल्याने त्यांची ही सुरक्षा कायम आहे. सोबतच अन्य ३१ आमदारांचीही ही सुरक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे जनतेचा पैसा आणि राज्य सरकारची तिजोरी यातून कोट्यावधींची उधळण आमदारांच्या दिमतीसाठी होत आहे.

दरम्यान याबाबत एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे गटाच्या या आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. जलील म्हणाले की, शिवसनेचे आमदार स्वतःला वाघ म्हणतात, पण वाय दर्जेची सुरक्षा घेऊन फिरणारे हे कसले वाघ आहे. बंडखोरी केल्यावर हे आमदार म्हणाले होते की, आम्हाला कुणाचीच भीती नाही. मग सोबत सात-आठ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन का फिरतात? त्यांच्यावर आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च सरकारच्या तिजोरीतून केला जात आहे. त्यामुळे हे पैसे त्यांच्याकडून का वसूल केले जात नाही. त्यामुळे या वाघांची सुरक्षा तात्काळ काढून घ्यावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT