अस्मानी संकटांनी बळीराजा हतबल झाला असतानाच कर्जमाफीची त्याला आशा आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला पहिल्या टप्प्यात केवळ 15 हजार कोटींचाच निधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सहकार आणि वित्त विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्या ग्रीन लिस्टसाठी अधिवेशनात तरतूद होईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जमाफीचा दिलासा मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधीही थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. थकीत आणि चालू कर्ज असलेले नेमके किती शेतकरी आहेत ते पाहूयात..
कोणत्या शेतकऱ्यांची किती आकडेवारी?
दोन लाखांपेक्षा कमी थकीत कर्ज असलेले १६ लाख ७४ हजार शेतकरी
दोन लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले 12 लाख 71 हजार शेतकरी
दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेले २ लाख ९० हजार शेतकरी
चालू आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या 23 लाख ६३ हजार शेतकरी आहेत.
त्यामुळे पहिल्या टप्प्य़ात यातल्या केवळ थकीत असलेल्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतऱ्यांमध्ये नाराजी पसरलीय. यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे. पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आधीच धास्तावलेला आहे. अशा स्थितीत प्रत्यक्ष कर्जमाफी नेमकी किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत आता संभ्रमाचं वातावरण तयार झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.