राज्यात १३ हजार शिक्षकांच्या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पार पडणार आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनुदानित शाळांतील रिक्त पदे भरली जाणार
शिक्षकांच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यात १३ हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती 'पवित्र' पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिक्षण विभागाने केवळ सध्या रिक्त पदेच नव्हे, तर मे २०२६ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतलाय.
१ ते ३१ मे या कालावधीत सर्व शाळांनी रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आलंय. त्यानंतर जूनमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शाळांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने सर्व प्रक्रिया पारदर्शक असणार असल्याचा दावा करण्यात येणार आहे.
'पवित्र' पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबवून वशिलेबाजीला आळा घालण्यात येईल, असा दावा शासनाकडून करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय होणार आहे. मात्र खासगी संस्थांना प्रत्येक जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आलीय.
राज्यात तब्बल १,७०० तलाठी पदांची भरती 'एमपीएससी'कडून होणार असून, यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. शासन निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.