Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

भावनिक मुद्दा काढून तेढ निर्माण करणे महाराष्ट्राला परवडणार नाही : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीत राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेवून राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली होती. मशिदींवरील भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला होता. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीत राज ठाकरे यांच्यावर (Raj Thackeray) नाव न घेता टीका केली.

आज देशात आणि राज्यात जातीपाती आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भावनिक मुद्दा काढून तेढ निर्माण करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) नवा न घेता लगावला. सरकार येतील सरकार जातील पण त्याचा वापर योग्य रीतीने करणे गरजेचे आहे. सर्व समाजाला एकसंघ घेऊन जाण्याची गरज आहे, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

अलिकडच्या काळात तरुणांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे. तरुणांच्या हातात मोबाईल आला आहे. थोडकीच माहिती मिळाली पाहिजे समाज काळानुसार बदलत आहे. आम्ही सत्तेवर आलो २ लाख शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ केले. वेळेवर परत फेड करणाऱ्यांना ५० हजार सवलत देण्याचे सांगितले. पण कोरोनाच्या काळात ते आमलात आणता आले नाही. पण आता त्याची यादी मागवून ते देण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

आपण या भारतात राहत असताना जर दुसऱ्या राज्यात काही वेगळे देत असतील. पण हा महाराष्ट्र आहे. याठिकाणी महाराष्ट्र कुठे माघे राहणार नाही. असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

Ayurveda Health Care: शिळं अन्न खाताय? ३ तासातच होतील आरोग्यावर परिणाम; आयुर्वेदाचा इशारा

Navratri Fasting Tips: नवरात्रीचा उपवास सोडताना काय खावे अन् काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT