अहमदनगर-संगमनेर पठार भागातील वीस गावे पुढील दहा दिवस बंद SaamTv
महाराष्ट्र

अहमदनगर-संगमनेर पठार भागातील वीस गावे पुढील दहा दिवस बंद

अहमदनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच संगमनेर शहरासह तालुक्यातील पठारभागातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येऊ लागल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी साकूर गावाला भेट देत परिस्थितीची पाहणी करून पठार भागातील वीस गावात उद्या पासून दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहे.

हे देखील पहा -

जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी संगमनेर तालुका तसेच साकूर भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करुन नियमांचे उल्लंघन यास कारणीभूत असल्याचे सांगितले.

साकूरसह पिंपळगाव देपा, हिवरगाव, पठार व नांदूर खंदरमाळ, या भागातून दररोज 30 ते 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याची बाब अतिशय गंभीर असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मंगल कार्यालये ‘सील’ करण्यासह दुपारी चारनंतरही दुकाने सुरु ठेवणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या पासून दहा दिवस पठारावरील वीस गावामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT