लातूर वस्तीगृहात अन्नात झुरळ आणि पाण्यात शेवाळ आढळले
सुमारे १००० विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका
निकृष्ट दर्जाच्या जेवणावर विद्यार्थ्यांचा संताप
प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी
संदीप भोसले, लातूर
पुण्यातील शासकीय वस्तीगृहातील अशुद्ध पाणी पिऊन काही दिवसांपूर्वी मुलांना विषबाधा झाली होती.हे प्रकरण ताजे असतानाच लातूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ, तर पाण्यात शेवाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याbabt प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील १२ नंबर पाटी परिसरातील सुमारे १००० मुला-मुलींच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ आढळल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच मुलींच्या वस्तीगृहात पिण्याच्या पाण्यात शेवाळ साचल्याचेही समोर आले असून, हा गंभीर प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड मधील मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील दूषित पाणी प्यायल्याने विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.