अभय सोळुंके । Abhay Salunke  SaamTVNews
महाराष्ट्र

निलंगेकरांचे आंदोलन म्हणजे खोटारडेपणा आणि घाणेरडेपणा : अभय सोळुंके

"पाणी गढूळ दिसण्यासाठी पाण्यात मिसळले रंग; मनपाच्या दारात भाजपची स्टंटबाजी."

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या दोन आठवड्यांपासून नळाद्वारे पुरवठा करण्यात आलेल्या पाण्याचा रंग काहीसा पिवळसर आला होता, त्यानुसार नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून मनपाच्या वतीने पाण्याची टेस्ट घेऊन हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करत भाजपच्या वतीने दोन दिवसांपासून शहरात बॅनरबाजी करत आज आंदोलनाचा इशारा दिला होता.

हे देखील पाहा :

मात्र, प्रत्यक्षात पाण्याचा रंग जास्त गढूळ दिसावा यासाठी पाण्यात पिवळा आणि लालगुलाबी रंग मिसळून ते पाणी रिकाम्या बाटल्यात भरण्यात आले. दोन टेम्पो भरून रंगमिश्रित पाण्याच्या बाटल्या भरून आणून पालिकेच्या दारात ओतण्यात आल्या. हे आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. लोकांच्या देखील लक्षात आले कि हे पाणी गढूळ नसून रंगमिश्रित आहे. आता भाजपचे आजचे आंदोलन हे काँग्रेस नेत्यांना आयतं कोलीत मिळालेले आहे.

यावर अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके (Abhay Salunke) यांनी कडाडून टीका केली आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हळद टाकून पिवळे पाणी नागरिकांना पुरवठा केला म्हणून आंदोलन केले. हा शुध्द खोटारडेपणा आणि घाणेरडेपणा असून जिल्ह्यात जेष्ठ नेत्यांनी उत्तम परंपरा घालून दिली असून याला काळिमा फासल्याचे म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT