राज्यात सर्वत्र मोठंमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीये. या समस्येमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थीही हैराण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी रस्त्यांच्या दुरावस्थेकडे अनोख्या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधलंय. प्रशासनाने रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष द्यावं, यासाठी विद्यार्थिनींनी केलेला उपरोधिक ग्राऊंड रिपोर्टिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. शाळकरी मुलींनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची कशी पोलखोल केलीये, तुम्हीच पाहा...
विद्यार्थिनींनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येवर उपरोधिक शैलीत आवाज उठवलाय. तर दुसरीकडे, कोकणातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. गुहागर-विजापूर महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालीये.
चिपळूण ते पाटण दरम्यान तब्बल 1235 खड्डे पडलेत. यामध्ये काही खड्डे तब्बल 15 फूटाचे आहेत. चक्क मोजपट्टीनं मापून नागरिकानं 15 फुटांचा खड्डा पडल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा दिलाय. मात्र ही स्थिती फक्त कोकणात नाही तर राज्याच्या अनेक भागात आहे. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एक महिला आणि एका जवानाचा अपघातात मृत्यू झालाय. तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय. शहरातील रस्ते मृत्यूच्या दाढेत ढकलत असताना ग्रामीण भागातील रस्त्यांचीही अवस्था दयनीय झालीये. त्यामुळे या शाळकरी मुलींच्या उपरोधिक 'ग्राऊंड रिपोर्टिंग'नंतर आणि नागरिकांच्या इशाऱ्यानंतर तरी सुस्त यंत्रेणेला जाग येणार का? की असाच त्रास सहन करत नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार? हाच खरा सवाल आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.