Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: गुंगीचे औषध देवून कारमधून गायींची तस्करी; एक आरोपी ताब्‍यात, पाच फरार

गुंगीचे औषध देवून कारमधून गायींची तस्करी; एक आरोपी ताब्‍यात, पाच फरार

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण रेतीबंदर रोड परिसरात काही गाईंना आणण्यात आल्याची माहिती कल्याण (Kalyan) बाजार पेठ पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच तत्काळ बाजारपेठ (Police) पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली. तर २ गायींची सुटका केली. सोयाब निजाम असे अटक आरोपीचे नाव आहे. (Breaking Marathi News)

ग्रामीण भागात रानामध्ये चारा खात असलेल्या गाईला आणि बैलाला गुंगीचे इंजेक्शन मारायचे. ही जनावर खाली पडल्यानंतर त्यांना एका चादरीमध्ये गुंडाळून पाच ते सहा जण मिळून त्यांना गाडीच्या डिक्कीमध्ये भरून गाईंची वाहतूक करायचे. कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता धारदार शस्त्राने निर्दयीपणे गोवंश जनावराची हत्या करत त्यांचे अवयव विकायचे. अशाच प्रकारे सुरू असलेल्‍या तस्‍करीबाबत पोलिसांना माहिती मिळाल्‍यानंतर कल्याण बाजार पेठ पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.

पाच साथीदार फरार

या दरम्यान छाप्यात पाच आरोपी इब्राहिम इस्माईल माजीद उर्फ ​​पापा हड्डी, अरबाज, गोरू, मच्छी, आवली, बर्क्या असे त्याचे पाच साथीदार मात्र निसटले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करत एक रिक्षा व दोन हातगाड्या, लोखंडी रॉड, हुक, सुतळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

SCROLL FOR NEXT