अभिजित देशमुख
कल्याण : सिंगल युज प्लास्टिकवर बंदी असताना देखील कल्याण- डोंबिवली शहरात सिंगल युज प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. अशा पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर केडीएमसीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाई दरम्यान एपीएमसी मार्केटच्या गुल बाजारातून सोमारे ५०० किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत. शहरात विविध ठिकाणी या कारवाई करण्यात येत आहे.
सिंगल युज प्लास्टिक न वापरता त्या ऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या वापराव्यात; असे आवाहन केडीएमसी कडून करण्यात येत आहे. असे असताना देखील व्यापारी जुमानत नसल्याने केडीएमसीने आजपासून धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिका आणि प्रदूषण नियत्रण मंडळाची संयुक्त कारवाई करत कल्याण एपीएमसी मार्केटमधील फुल बाजारात फुल विक्रेत्यांकडून ५०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेतांना दंड देखील ठोठावण्यात आल्याची केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्लास्टिकच्या पातळ पिशव्या म्हणजेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिशव्या वापरानंतर या पिशव्या नाल्यात गटारात फेकल्या जात असल्याने नाले गटार तुंबतात. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज कल्याण डोंबिवली शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली.
दंडात्मक कारवाई
कल्याणमधील एपीएमसी मार्केट येथील फुल बाजारात छापा टाकत अधिकाऱ्यांनी जवळपास ५०० किलो प्लास्टिक जप्त केलं. संबंधित व्यापाऱ्यांना दंड देखील ठोठावला. यावेळी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. तसेच सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये. त्या ऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा अन्यथा कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात आला असा इशारा केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.