Rajesh Tope Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: राज्यपालांवरील कारवाईची योग्य वेळ कधी; आमदार राजेश टोपे यांचा फडणवीसांना सवाल

राज्यपालांवरील कारवाईची योग्य वेळ कधी; आमदार राजेश टोपे यांचा फडणवीसांना सवाल

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यपाल हटावच्या मागणीसाठी जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. या दरम्‍यान राज्यपालांवरील कारवाईची ती योग्य वेळ नक्की कधी येणार? असा सवाल जालन्यात (NCP) राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी फडणवीसांना विचारला आहे. (Letest Marathi News)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटलेत. आज मराठा मोर्चाच्या वतीने (Jalna) जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली. त्याला समविचारी सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपालांवरील कारवाईची ती योग्य वेळ कधी येणार? असा सवाल टोपे यांनी उपस्थित केला.

तर बंदचे लोण संपूर्ण महाराष्‍ट्रात

येत्‍या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांविरोधात पहिला ठराव घ्यावा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक संजय लाखे यांनी केली आहे. राज्यपालंवर कारवाई झाली नाही; तर बंदचं लोण संपूर्ण महाराष्ट्र नेऊ असा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT