Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

Jalna News : जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी

लक्ष्मण सोळुंके

जालना : यंदा जालन्यासह राज्यात पाऊस कमी झाला आहे. यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाले आहे. यात (Jalna) जालन्यातील जाफ्राबाद तालुक्यात देखील यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने (Jafrabad) जाफ्राबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Maharashtra News)

यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान झाले आहे. उत्पनात देखील घाट झाली असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या राज्यातील ४० तालुक्यामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारने जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी; अशी मागणी केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीने काढला मोर्चा 

सदर मागणीसाठी आज राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसिल कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कपाशीला प्रती क्विंटल १० हजार तर सोयाबीनला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT