जालना : जालना जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस नाही. अशात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असतांना कृषिमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) व पालकमंत्री अतुल सावे हे (Jalna News) जिल्ह्यात फिरकले नाही. यामुळे राज्याचे कृषिमंत्री मुंडे व पालकमंत्री अतुल सावे हे हरवले असल्याचे बॅनर जालन्याय झळकले आहे. (Breaking Marathi News)
जालना जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापासून पावसाचा थेंबही पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या पिकांची वाळलेली काडी झाली आहे. मात्र (Farmer) शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नसून राज्यात राजकीय मंडळी राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहे. दुष्काळी परिस्थिती झाली असताना शासनाकडून कोणताही निर्णय किंवा घोषणा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेली नाही. आर्थिक संकटात असलेला शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून कृषीमंत्र्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांदाकडे पाठ फिरवली आहे.
शेतकऱ्यांनीच लावले बॅनर
कृषी मंत्री आणि पालक मंत्री कुठं आहे? असा प्रश्न निर्माण झाल्याने भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे आणि बरंजळा साबळे गावातील शेतकऱ्यांनी जालना- जळगाव महामार्गांवरील फाट्यावर चक्क कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पालकमंत्री अतुल सावे हरवल्याचे बॅनर लावले आहे. इतकेच नाही तर बॅनर लावून दोन्ही मंत्री कुणाला सापडल्यास मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा; त्या मंत्र्याना पावसाअभावी सुकलेल्या पिकांचा पालापाचोळा भेट देणे आहे अशा आशयाचा बॅनर लावला आहे. हे बॅनर लक्ष वेधत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.