जालना : ऊसाची बैलगाडी खाली करण्यावरून दोन मजुरांमध्ये प्रचंड वाद झाला. या वादात गुप्तांगावर मार लागल्याने ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घनसावंगी (Ghansangvi) तालुक्यातील सागर सहकारी कारखान्यावर (Sagar Sugar Factory) घडलीय. या घटनेने परिसरात एकच खबळ उडाली आहे. घनसावंगी तालुक्यातील मुरमा गावातील ऊसतोड कामगार गुलाबराव केरभान सोनवणे हा आज सकाळी पाचच्या सुमारास ऊसाची तोडणी करून कारखान्यावर बैलगाडी भरून घेऊन गेला होता.
हे देखील पहा :
बैलगाडीतील ऊस गव्हाणीवर खाली करण्यासाठी त्यांनी बैलगाडी क्रेनजवळ उभी केली असता त्या ठिकाणी दीपक लक्ष्मण गायकवाड या ऊस तोड कामगारांनी त्यांची गाडी आडवी लावली. ही आडवी लावलेली गाडी काढण्यास सांगत असतांना दीपक आणि गुलाब यांच्यात वाद (Fighting) निर्माण झाला. या वादात दीपक याने गुलाब यांच्या बैलगाडीवर चढून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत गुलाब यांच्या गुप्तांगावर लाथाचा जोरदार मार लागल्याने ते बेशुद्ध होऊन त्यांचा जागीच मृत्यु (Death) झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडलीय. या प्रकरणी मयत गुलाब सोनवणे यांचा मुलगा नवनाथ सोनवणे यांचा फिर्यादीवरून आरोपी ऊस तोड कामगार दीपक गायकवाड याच्याविरुद्ध भादंवि 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.