Jalna Cyber Crime 
महाराष्ट्र

Jalna Cyber Crime : जालन्यात सायबर चोरांकडून तीन कोटी ७० लाखांचा गंडा; सहा महिन्यात ५९८ जणांची फसवणूक

Jalna News : वेगवेगळी आर्थिक आमिष, प्रेम प्रकरण, ब्लॅकमेलींग यासह इतर प्रकरणात आर्थिक फसवणुक केल्याचे २४ गुन्हे दाखल

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: गेल्या काही दिवसांमध्ये सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावरून संपर्क करून वेगवेगळ्या पद्धतीने आमिष देत फसवणूक केले जात असतात. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील सहा महिन्यात तब्बल ५९८ जणांची फसवणूक करण्यात आली असून यात ३ कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

जालना (Jalna) जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून गेल्या सहा महिन्यात ५९८ जणांना सायबर गुन्हेगारांनी ३ कोटी ७० लाखांना गंडा घातला आहे. वेगवेगळी आर्थिक आमिष, प्रेम प्रकरण, ब्लॅकमेलींग (Cyber Crime) यासह इतर प्रकरणात आर्थिक फसवणुक केल्याचे २४ गुन्हे दाखल झाले आहेत. या एकूण गुन्ह्यात २७ लाख रुपये होल्ड करण्यात आले. तर १२ लाख रुपये फिर्यादीना परत केले आहे. तर अन्य फसवणुकीच्या गुन्ह्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. 

दरम्यान सोशल मीडियावर सुरूवातीला प्रेमाचे आमिष दाखवून त्यानंतर अश्लिल फोटो किंवा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग होत असल्याच्या देखील घटना समोर येत आहे. यामुळे सोशल मीडियावरून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आमिषाला बळी न पाडण्याचे (Cyber Police) आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT