जळगावातील भैय्या पाटील यांच्या आत्महत्येनंतर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलीस तपासात निष्पन्न झाले की, मृत भैय्या पाटील यांच्या पत्नीला मुलीच्या लग्नाबाबत संपूर्ण कल्पना होती. या प्रकरणी पोलिसांनी ४ संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेनंतर या प्रकरणात अधिक गुंतागुंत वाढलीय. लग्नाचा बनाव रचून पैसे आणि दागिने उकळणाऱ्या टोळीने आणखी कुणाला फसवलंय का? याचाही तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
भैय्या पाटील हे मुळचे जळगावातील हरी विठ्ठल नगरातील रहिवासी होते. भैय्या पाटील यांची मुलगी प्रियंका पाटील हिला काम देण्याच्या बहाण्याने विक्री केल्याची माहिती आधी देण्यात आली होती. नंतर आरोपींनी मुलीचं कोल्हापुरातील एका व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं, यासह लैंगिक शोषण केलं. यातून ती गर्भवती राहिली असून, आरोपीनी तिचा गर्भपात केला. हा सर्व प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर भैय्या पाटील यांनी जीवन संपवलं.
मात्र, या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास करत ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापूरचे रहिवासी आशिष गंगाधरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गंगाधरे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच लग्नाचा बनाव रचून २ लाख रोकड आणि ४ किलो तोळं सोनं घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाचा बनाव रचून फसवणुकीच्या प्रकरणात भैय्या पाटील यांच्या पत्नीचाही समावेश आहे. आरोपींपैकी मनिषा जैन या महिलेचाही समावेश आहे. या महिलेवर याआधीही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. जळगावच्या या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, भैय्या पाटील यांची पत्नी मनिषा पाटील यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच जळगावसह कोल्हापुरातील संशयित आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.