Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: यावल तालुका परिसरात वादळी वारा; पत्री शेड पडल्‍याने घोड्याचा मृत्‍यू

यावल तालुका परिसरात वादळी वारा; पत्री शेड पडल्‍याने घोड्याचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

हिंगोणा (जळगाव) : यावल तालुक्यातील परसाडे परिसरात व संपुर्ण तालुक्यात (Yawal) रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वारा झाला. या वाऱ्यात घोडा बांधलेले एक घर कोसळल्याने त्यात घोड्याचा मृत्यु झाल्याची (Jalgaon News) घटना घडली आहे. (Live Marathi News)

यावल तालुक्‍यातील परसाडे गाव परिसरात २९ मेच्या रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास चक्रीवादळ आले. यामुळे परसाडे तालुका यावल येथील पीरखा लालखा तडवी यांच्या घोडा बांधलेल्या घराचे पत्र्यांसह छत कोसळून घोडा लाकडा खाली व पत्राखाली दाबला जाऊन गुदमरून मरण पावला आहे. गरीब कुटुंबातील पिरखा तडवी यांच्या कुंटुबाचा पोटापाण्याचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्‍या घोड्याची परिसरात मोठ्या प्रमाणात नवरदेवांची लग्नासाठी मागणी असायची. वादळी वाऱ्यात मृत्‍यू झाल्‍याने आदिवासी कुटुंबाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा परसाडे येथील तलाठी समीर तडवी व ग्रामसेवक मजीत तडवी यांनी केला.

केळीचे पिकही पडले

यावल तालुक्‍यात झालेल्‍या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील केळीचे पिक देखील मोडून पडले आहे. काही शेतांमधील केळीचा पाडा पडणार होता. काही नवती बाग असल्‍याने केळीचे खोड वाकून पडले आहे. यामुळे शेतकरीचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT