भाजीपाल्‍याचे
भाजीपाल्‍याचे  
महाराष्ट्र

भाजीपाल्‍याचे दर पाहुन व्‍हाल अवाक..पावसाचा परिणाम

संजय महाजन

जळगाव : सलग पाऊस झाल्‍याने त्‍यातच अतिवृष्‍टीमुळे बाजारात येणाऱ्या भाजीपाल्‍याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला पोहचले असून सर्वसाधारण गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. (jalgaon-news-result-of-rains-the-prices-of-vegetables-increased)

सतत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम सर्वत्र जाणवायला लागला. याचाच परिमाण जिल्ह्यात सध्या बाजारावर झालेला दिसून येत आहे. पावसामुळे पालेभाज्‍या सडल्‍या आहेत. यामुळे सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली असून भाज्यांचे दर वाढले आहे. सद्यस्थितीत बाजारात मेथी, पालक, कोबी, पोकळा, कोथिंबीर यासह इतर भाज्यांचे दर प्रत्येकी पाच ते दहा रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वसाधारण कुटुंबातील गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.

भाजीबाजार मंदावला

वाढत्या पावसामुळे पालेभाज्या ताज्या व टवटवीत मिळत नाहीत. मात्र तरीही त्या खरेदी कराव्या लागत असल्‍याचे महिलांनी सांगितलेय. सध्या जिल्‍ह्यातील अनेक भागात ओला दुष्काळी परिस्थिती असल्‍याचा परिणाम भाजीपाल्यावर झालेला दिसून येतो. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक देखील कमी झाली असून भाज्यांचे दर वाढले आहेत. परिणामी भाजीबाजार मंदावला आहे.

असे आहेत दर

भाजी....दर (प्रतिकिलो)

फ्लॉवर...६०

पत्‍ताकोबी..४०

टमाटे......५०

वांगे........५०

वटाणे.....१२०

मेथी.......६०

चवळी शेंगा...८०

कांदा पात.....६०

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT