Gulabrao patil Saam tv
महाराष्ट्र

केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात भारनियमन; पालकमंत्री गुलाबराव पाटील

केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात भारनियमन; पालकमंत्री गुलाबराव पाटील

संजय महाजन

जळगाव : राज्‍यात भारनियमन होत आहे. सर्वस्‍वी केंद्र सरकार जबाबदार आहे. कारण केंद्र सरकारने राज्याला कोळसा पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसेच भारनियमनामुळे शेतकरी (Farmer) व उद्योजकांचे जे काही नुकसान होत आहे, त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्‍याचा आरोप देखील पाटील यांनी केला. (jalgaon news non availability of coal from the central government statment for gulabrao patil)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

तर खासदारांचा जाहीर सत्‍कार केला असता

भारनियमनाच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी भाजपने काढलेल्या आक्रोश मोर्चात खासदार उमेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर टीका केली होती. खासदार पाटील यांनी केलेल्या टीकेचाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. खासदार उन्मेष पाटील यांनी इकडे बोंबा मारण्यापेक्षा केंद्राकडून कोळसा मिळावा म्हणून प्रयत्न केले असते, तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता. अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी उन्मेष पाटलांना फटकारले आहे. हा पठ्ठ्या राहिला नसता तर उन्मेष पाटील दिल्लीदरबारी गेले नसते, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT