Hatnur dam 
महाराष्ट्र

हतनूरचे १६ दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूरचे १६ दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : हतनूर धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी सातला धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज (ता.१२) सकाळी तापी नदीपात्रात ४५ हजार ८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. (jalgaon-news-hatnur-dam-overflow-and-16-door-open-today-morning)

जळगाव जिल्ह्यात तुरळक स्‍वरूपाचा पाऊस होत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून देखील जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र तापी नदीच्‍या वरच्‍या भागाकडे पाऊस होत असल्‍याने तसेच हतनूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे धरण भरले असल्याने आज सकाळी सातला काही दरवाजे उघडण्यात आले आहे.

सतर्कतेचा इशारा

पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांचेतर्फे करण्यात आले आहे. पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT