महाराष्ट्र

जिल्ह्यात ५ जूननंतरच पावसाची हजेरी; तापमान पाच अंशाने खाली

मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने तापमानात घट झाली आहे

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात काही दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. तापमानातही घट झाली आहे. तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यात सोमवारपासून (ता. ३०) पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. जळगावात (Jalgaon) मात्र पाच जूनपर्यंत तरी पाऊस पडणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. (jalgaon news come of rains after 5th June)

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. वाऱ्यांचा वेग २९ ते ५६ किलोमिटर प्रतितास असा आहे. कधी हळूवार तर कधी वेगाने वारे वाहतात. यामुळे कडक तापमानाने (Temperature) हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी (ता. २९) ४० अंश तापमान नोंदवले गेले. गेल्या आठ दिवसांपासून तापमान ४५ ते ४६ अंशादरम्यान होते. मॉन्सूनचे (rain) केरळमध्ये आगमन झाल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने तापमानात घट झाली आहे.

शेती झाली तयार

खरीपातील बीटी बियाणे विक्री एक जूनपासून सुरू होईल. असे असले तरी पेरणीसाठी सर्वच शेतकऱ्यांनी (Farmer) शेते तयार करून ठेवली आहे. आता त्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस पडल्याने शेतातील जमिनीतील उष्णता जाऊन जमीन गार होते. शेतातील मातीचे मोठे खडे विरघळून जातील. त्यानंतर नांगरणी करून शेत पेरणी योग्य बनविता येणार आहे. यामुळे पाऊस केव्हा पडतो व शेत एकदाचे तयार करतो, असे शेतकऱ्यांना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

SCROLL FOR NEXT