Eknath Shinde And Gulabrao Patil Vs Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, गुलाबराव पाटील चांगलं भाषण करायचे म्हणूनच...

आपण प्रचंड प्रेम दिलं, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये घवघवीत यश मिळालं. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि भाजपमुळे हे यश मिळालं.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन करायला आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला, शिवतीर्थावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) चांगलं बोलायचे म्हणून त्यांचे भाषण बंद केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केला. या उद्घाटन सोहळ्यासाठी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आणि उदय सामंत, शहाजीबापू पाटील यांच्यासह भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले, आपण प्रचंड प्रेम दिलं, काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये घवघवीत यश मिळालं. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि भाजपमुळे हे यश मिळालं. फक्त अडीच महिन्यात आम्ही एवढं यश मिळालं, ये तो झाकी है; असं मुख्यमंत्री म्हणताच, 'ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है;' असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

तसंच राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय, हे मी वारंवार सांगत होतो, मात्र, झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागं करणार? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली.

ते पुढे म्हणाले, युतीमध्ये निवडणूक लढवली, नंतर काय झालं? मग गद्दार कोण? अडीच वर्षात आमदार, खासदारांची जेवढी कामं झाली नाहीत, तेवढी फक्त अडीच महिन्यात केलीत. त्यामुळे आता ते घाबरलेत, कारण एकनाथ शिंदे गणपतीसह सर्व ठिकाणी फिरतोय, माझ्यामुळे त्यांना फिरावं लागतय, माझ्यामुळे गणपतीचं दर्शनाला जावं लागतं होतं, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. तसंच आपलं सरकार, एसटी कर्मचाऱ्यांसह, जळगावकरांचे प्रश्न सोडविणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

गुलाबराव शिवसेनेचा ढाण्या वाघ असून शिवतीर्थावर गुलाबराव यांचं भाषण चांगलं व्हायचं म्हणून ते बंद करण्यात आलं. पण, गुलाबराव मी कद्रू मनाचा नाही, हा एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे. गुलाबराव पाटील यांना पान टपरीवाला म्हटले,कोणाला हिंणवण्याचे काम करू नये. मी शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालो हे चालत नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आम्ही दोन वर्षात एवढं काम करू की औषधला सुद्धा कोणी शिल्लक राहिल की नाही हे सांगत येत नाही. कोणी गोमूत्र शिंपडतो आहे. हे तेवढेच शिल्लक राहतील, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचे आहे. आम्ही निवडणूक बघून काम करत नाही.

आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय आज आमची संख्या १७० च्या वर गेली असून यामध्ये आणखी ३० वाढवायचे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत. शिवाय तुमचे प्रश्न शिवसेना-भाजप युतीचं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन देत, गुलाबराव पाटलांनी कोणतेही खोके घेतलेले नाही त्यांना खोके घेण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

Constipation: सकाळी पोट साफ होत नाही? मग रात्रीच्या खाण्यात करा हा बदल; 1 मिनिटांत पोट होईल साफ

SCROLL FOR NEXT