corona free
corona free 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍ह्याला दिलासा..आणखी एक तालुका कोरोनामुक्त

Rajesh Sonwane

एरंडोल (जळगाव) : जळगाव जिल्‍ह्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. रोज संक्रमित होणाऱ्या रूग्णांची संख्‍या देखील कमी झाली असून, ॲक्‍टीव रूग्णांची संख्‍या कमी झाली आहे. यापुर्वी बोदवड तालुका कोरोनामुळे झाला असून आता एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे एरंडोल तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तालुक्यातून कोरोना हद्दपार झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (jalgaon-corona-update-Jalgaon-district-erandol-taluka-is-free-from-corona)

देशात कोरोनाचे संकट वाढल्यामुळे तालुक्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. तालुक्यात ६ हजार ७०८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. ६ हजार ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २३१ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. सद्यस्थितीत तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यामुळे तालुक्याने कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे.

तरीही सावधानता आवश्‍यक

तालुका कोरोनामुक्त झाला असला तरी आगामी काळात येणारी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. शहरासह ग्रामीण भागात मार्च, एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रांताधिकारी विनय गोसावी, मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, डॉ. कैलास पाटील, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ते नियोजन करून नागरिकांना दिलासा दिला होता. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तींची बैठक घेवून ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी प्रांताधिकारी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आर्थिक मदत केली होती.

एकमेकांच्‍या साथीने शक्‍य

कोरोनामुळे कडक लॉकडाऊन असल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे रोजगार बंद झाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. शहरातील विविध सामाजिक संघटना, दानशूर नागरिकांनी गोरगरीब नागरिक, आदिवासी बांधवांना जिवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन त्यांना दिलासा देण्याचे काम केले होते. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्‍यामुळे तसेच नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन केल्यामुळे तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला आहे.

धोका कायम

तालुका कोरोनामुक्त झाला असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. संभाव्य तिसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन करून कोरोनाची तिसरी लाट तालुकाय्त येणार नाही; यासाठी प्रशासनातर्फे केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट

Accident News: अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा जागीच मृत्यू, हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Petrol Diesel Rate 28th April 2024: पेट्रोल-डिझेल स्वस्त की,महाग? जाणून घ्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचा भाव

Mumbai News: मुंबईत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; भांडूपमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त

Gondia News: अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण; सामूहिक अत्याचार करुन हत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT