ओबीसी आरक्षणावरून भाजपमध्ये अंतर्गत मतभेद हे दुर्दैव - सानप विनोद जिरे
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणावरून भाजपमध्ये अंतर्गत मतभेद हे दुर्दैव - सानप

जर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करू असा इशारा ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.

विनोद जिरे

बीड - केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजपमध्ये, ओबीसी आरक्षणावरून मतभेद दिसत आहेत. राज्यातील भाजप ओबीसी आरक्षणावरून आंदोलन करत आहे. तर केंद्रातील भाजप सरकारने ओबीसींची जनगणना होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणावरून, भाजपमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. हे अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. जर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करू. असा सज्जड इशारा ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी बीडमधून दिला आहे. ते ओबीसी जागर मेळावा समारोप कार्यक्रमात बोलत होते.

हे देखील पहा -

केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना होणार नाही. असं स्पष्ट केल्यानंतर आता मराठवाड्यातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. तर याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जय भगवान संघाच्यावतीने, ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी, मराठवाड्यात विविध संघटना एकत्र करत, ओबीसी जनजागरण मोहीम सुरू केली आहे. जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबादमध्ये मेळावा झाल्यानंतर, आज बीडमध्ये या मेळाव्याचा समारोप झाला.

या मेळाव्यामधून विविध संघटनेच्या नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा देखील ठरवण्यात आली आहे. जर सरकारने याची दखल घेतली नाही. तर राज्यभर तीव्र आंदोलने, रस्ता रोको करण्यात येतील. असा इशारा देखील बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT