Inspiring Story Saam TV
महाराष्ट्र

Inspiring Story : मानलं भावा! घरी हालाखीची परिस्थिती असूनही मागे हटला नाही; पहिल्याच प्रयत्नात ४ स्पर्धा परीक्षा केल्या पास

Ruchika Jadhav

सरकारी नोकरी मिळणं सध्याच्या काळात फार कठीण गोष्ट झाली आहे. प्रत्येकाला नोकरी मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागतेय. स्पर्धाही मोठ्या-प्रामाणात वाढल्या आहेत. या स्पर्धेच्या युगातही अनेक विद्यार्थी हालाखीच्या परिस्थितीवर मात करत यशाला अशी काही गवसणी घालतात की ते अनेकांसाठी आदर्श बनतात. लातूरमधील अशाच एका पठ्ठ्याने आपल्या यशाने साऱ्यांनाच थक्क केलं आहे.

नरसिंह जाधव असं या पठ्ठ्यांचं नाव. त्याने सरकारी नोकरीसाठी चार परीक्षा दिल्या आणि चारही परीक्षेत तो पास झालाय. मूळचा लातूरचा रहिवासी असलेल्या नरसिंहचे वडील टेलरिंगचे काम करतात. लातूरमधून प्राथमिक शिक्षण घेऊन निरसिंहने सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं.

नरसिंहने आधी सिव्हील इंजिनिअर असिस्टंटची परीक्षा पास केली आणि परभणीत रुजू झाला. आता यावरच तो थांबला नाही. त्याच्या मनात यशाची भूक फार मोठी होती. त्यामुळे त्याने डिसेंबर २०२३ मध्ये पालघर जिल्हा परिषदेसाठी ज्युनियर इंजिनिअर, सिव्हील इंजिनिअर आणि राज्याच्या जलस्त्रोत विभागासाठी परीक्षा दिली होती.

या तिनही परीक्षा नरसिंह पास झालाय. असे असले तरी नरसिंहेचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाहीये. नरसिंहला क्लास वन अधिकारी व्हायचंय. म्हणून यापुढेही त्याने अभ्यास सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभ्यासाठी त्याने घेतलेली मेहनत सर्वजण पाहत आहेत. तसेच नरसिंहेचं हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी त्याचे वडील रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आतापर्यंत त्याने जे यश मिळवलं त्यात त्याच्या कुटुंबियांचा देखील मोलाचा वाटा असल्याचं नरसिंह स्वत: सांगतो. आता तो क्लास वन अधिकारी केव्हा होणार याची कुटुंबीय वाट पाहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT