Atal Setu  X Twitter CMO
महाराष्ट्र

India Longest Sea Bridge: २ तासाचा नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास २० मिनिटात होणार पूर्ण; काय आहे खास बात या 'अटल सेतु'ची

Bharat Jadhav

India Longest Sea Bridge Atal Setu :

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवाचे उद्धाटन करतील. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे नवी मुंबई मुंबईचा २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटात पूर्ण होणार आहे. या सी लिंकला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. या पुलाचे विशेषतः काय आहे हे आपण जाणून घेऊ...(Latest News)

मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या या पुलाची लांबी २२ किलोमीटर आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या पुलाला 'अटल सेतू' असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

काय आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अटल सेतूच्या खास गोष्टी

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार करण्यासाठी १८,००० कोटी रुपये खर्चून ते तयार करण्यात आलाय. हा पूल सहा लेनमध्ये पसरलेला आहे. २२ किमी लांबीचा हा पूल १६.५० किलोमीटर अंतर समुद्रात असून ५.५ किलोमीटर जमिनीवर असणार आहे. म्हणजेच या पुलाचा निम्मापेक्षा जास्त भाग समुद्रात असणार आहे. MTHL ने मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. याआधी नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास करण्यासाठी तब्बल २ तास लागात होते.

Atal Setu

महत्त्वाची बाब

पुलावरून प्रवास करताना वाहनांची वेग मर्यादा निश्चित करण्यात आलीय. ही वेग मर्यादा वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगळी असेल. कार, ​​टॅक्सी, मिनी बस आणि टू-एक्सल बसचा कमाल वेग १०० किमी प्रति तास असेल. इतर हलक्या मोटार वाहनांसाठीही हीच वेगमर्यादा निश्चित करण्यात आलीय. , सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावर चढताना आणि उतरताना वाहनांचा वेग ताशी ४० किमी ठेवावा लागणार आहे.

Atal Setu

या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ईस्टर्न फ्रीवेवर मल्टी-एक्सल अवजड वाहने, मुंबईच्या दिशेने जाणारे ट्रक आणि बस यांना परवानगी नसणार आहे. या मार्गाऐवजी या अवजड वाहनांना मुंबई-पोर्ट शिवडी एक्झिट (एक्झिट १ सी ) चा वापर करावा लागेल. आणि गाडी अड्डाजवळ एमबीपीटी रोडवर जावे लागेल. या मार्गावर वाहन चालकांकडून टोल घेतला जाणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने टोल प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर कार चालकाकडून २५० रुपये टोल वसूल केला जाईल.सुरुवातीला टोलचा दर ५०० रुपये सुचवण्यात आला होता, मात्र विविध बाबी लक्षात घेऊन टोलचा दर २५० रुपये करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT