अकोल्यात पुरेश्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या  Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात पुरेश्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

शेतकऱ्यांना अजूनही दमदार पेरणी योग्य पावसाची वाट आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला : अकोला जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसून शेतकऱ्यांना अजूनही दमदार पेरणी योग्य पावसाची वाट आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या केवळ 47 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. त्यामध्ये कपाशी व सोयाबीन पिकांचा समावेश आहे. पेरणी करण्यात आलेले क्षेत्र एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत केवळ 9 टक्के आहे, अशी माहिती कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी मुरली इंगळे यांनी दिली आहे.

यावर्षी राज्यात वेळीपूर्वीच मॉन्सूनचे आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची आगेकूच थांबली. परिणामी जून महिना अर्ध संपल्यानंतर सुद्धा अद्याप जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत. असे असले तरी काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था असल्याने त्यांनी पेरणीचा मुहूर्त साधला आहे.

त्यामध्ये अकोट, पातूर व तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तालुक्यांसह काही क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 47 हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. अकोला जिल्ह्यात एकूण क्षेत्र हे 4 लाख 83 हजार असून या क्षेत्रापैकी केवळ 9 टक्के पेरणी जिल्ह्यात आटोपली आहे. त्यामुळे अजूनही 90 टक्के पेरणी जिल्ह्यात बाकी आहे. असे असले तरी अद्याप कोरडवाहू क्षेत्रात खरीप पेरणी करण्यासाठी दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी मुरली इंगळे यांनी केले आहे

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT