Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update : सेन्यार चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा जोर वाढला

  • दोन चक्रीवादळांचा परिणाम हवामानावर

  • कोकण-पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण

  • तापमानात सतत चढ-उतार

राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शीत वारे वाहू लागले आहे. गेले तीन ते चार दिवस खराब असलेल्या वातावरणाने नागरिकांना हैराण केले. अशातच सेन्यार चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात डिटवाह चक्रीवादळ तयार झालं आहे. या दोन चक्रीवादळामुळे राज्यातील तापमान सतत बदलत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशाप्रकारचं संमिश्र वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

राज्यात गेले काही दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता तापमानात घेत होऊ लागली आहे. राज्यात मुंबई शहरासह ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, निफाड, जळगाव, वाशीम, कोकण या जिल्ह्यांत तापमानात घेत होऊन पुन्हा एकदा थंडी अनुभवायला मिळत आहे.

एकीकडे गुलाबी थंडी आणि दुसरीकडे चक्रीवादळाचं सावट निर्माण झालं आहे. तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला सेन्यार चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्याचा वेग १२० किमीपेक्षा जास्त राहील. महिन्याच्या अखेरीस २९ किंवा ३० तारखेला हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सेन्यार चक्रीवादळासोबतच देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात तयार झालेल्या शक्तिशाली हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील थंडीच्या वातावरणावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डीप डिप्रेशनमुळे दक्षिण भारतात अतिवृष्टीचा धोका असताना, या बदलांमुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रात किमान तापमान झपाट्याने घसरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध, भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

Lado Laksmi Yojana: महिलांसाठी खास योजना! दर महिन्याला मिळतात ₹२१००; लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

IND vs SA: रांची वनडेपूर्वी धोनीच्या घरी पोहोचला विराट; स्वतः माहीने चालवली कार

Kitchen Hacks : मीठाच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT