Mohan Bhagawat Saam Tv
महाराष्ट्र

विविध असूनही एक कसे राहायचे, जगाने भारताकडून शिकले पाहिजे : सरसंघचालक मोहन भागवत

मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरातील उत्तीष्ठ भारत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : 'आपण वेगळे दिसू शकतो. आपण वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकतो. पण आपण एकात्मतेने अस्तित्वात आहोत. वैविध्यपूर्ण असूनही एकजूट राहणे आणि पुढे जाणे हे जग भारताकडून शिकू शकते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले. भागवत यांनी रविवारी नागपुरातील (Nagpur) उत्तीष्ठ भारत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, समाज आणि देशासाठी काम करण्याची शपथ घ्या. देशासाठी काम करू, देशासाठी आयुष्य समर्पित केले पाहिजे.

जोश तरुणाई च दुसरं नाव आहे. मात्र तरुणांना होश देखील असायला पाहिजे, स्वतंत्र भारताचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना २०४७ मध्ये भारत कसा असावा यासाठी चे नियोजन करावे लागेल. वंदे मातरमचे नारे दिले तर अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली होती. भारतात विदेशी आक्रमण सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोटी कोटी लोकांनी बलिदान दिले, असंही मोहन भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले.

व्हिजन आणि अॅक्शनसाठी आजपासून तयार राहावे लागेल. भारत ३००० वर्ष सतत सर्वोच्च स्थानी राहिला आहे, त्यांनी कोणावर आक्रमण केले नाही. तो वैभवशाली भारत पुन्हा एकदा पाहायचा आहे. जे इतिहासकार भारत ३००० वर्ष जुना सांगतात ते अपडेट नाहीत. भारत ९००० वर्ष जुना आहे. पण हे आपल्या अभ्यासक्रमात नाही. पाठ्यक्रम बदलून हे सगळ सांगावे लागणार आहे. संस्कृतच व्याकरण ज्या भागात जन्मल ते आज भारतात नाही, असंही भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT