Mohan Bhagawat Saam Tv
महाराष्ट्र

विविध असूनही एक कसे राहायचे, जगाने भारताकडून शिकले पाहिजे : सरसंघचालक मोहन भागवत

मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरातील उत्तीष्ठ भारत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : 'आपण वेगळे दिसू शकतो. आपण वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकतो. पण आपण एकात्मतेने अस्तित्वात आहोत. वैविध्यपूर्ण असूनही एकजूट राहणे आणि पुढे जाणे हे जग भारताकडून शिकू शकते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले. भागवत यांनी रविवारी नागपुरातील (Nagpur) उत्तीष्ठ भारत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, समाज आणि देशासाठी काम करण्याची शपथ घ्या. देशासाठी काम करू, देशासाठी आयुष्य समर्पित केले पाहिजे.

जोश तरुणाई च दुसरं नाव आहे. मात्र तरुणांना होश देखील असायला पाहिजे, स्वतंत्र भारताचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना २०४७ मध्ये भारत कसा असावा यासाठी चे नियोजन करावे लागेल. वंदे मातरमचे नारे दिले तर अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली होती. भारतात विदेशी आक्रमण सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोटी कोटी लोकांनी बलिदान दिले, असंही मोहन भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले.

व्हिजन आणि अॅक्शनसाठी आजपासून तयार राहावे लागेल. भारत ३००० वर्ष सतत सर्वोच्च स्थानी राहिला आहे, त्यांनी कोणावर आक्रमण केले नाही. तो वैभवशाली भारत पुन्हा एकदा पाहायचा आहे. जे इतिहासकार भारत ३००० वर्ष जुना सांगतात ते अपडेट नाहीत. भारत ९००० वर्ष जुना आहे. पण हे आपल्या अभ्यासक्रमात नाही. पाठ्यक्रम बदलून हे सगळ सांगावे लागणार आहे. संस्कृतच व्याकरण ज्या भागात जन्मल ते आज भारतात नाही, असंही भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT