संजय राठोड
यवतमाळ - शेतकऱ्यांना फुकटाचं काहीच नकोय, रक्ताचं पाणी करून मातीत सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना राब राब राबून कधी कधी कवडीमोल भावात शेत माल विकावा लागतो. मात्र यवतमाळ (yavatmal) जिल्हातील आर्णी येथे एका शेतकरी महिलेने प्रामाणिकपणा दाखवत चुकीने फोन पे (phone pay) वरून खात्यात जमा झालेली ५० हजाराची रक्कम परत केली आहे. (honest female farmer gives 50 thousand rupees back to person who send money by mistake)
हे देखील पहा -
सध्या सायबर क्राईमच्या (cyber crime) माध्यमातून बॅक खात्यात असलेली रक्क्म उडविण्याचा घटना घडत आहेत. अशाही वातावरणात प्रामाणिकपणा (honesty) जिवंत ठेवणारी व्यक्ती असल्याचा प्रत्यय आर्णी तालुक्यातील शारी येथील शेतकरी महिलेने दिला. चुकीने खात्यात आलेले पैसे एका शब्दावर बॅंकेतून काढून दिले. अमोल देशमुख यांनी मित्राला दि. २६ जुलै रोजी फोन पे वरून ५० हजार रुपयांची रक्कम पाठविली. त्यांच्याकडे पैसे मिळाल्याची खातरजमा केली असता मित्राने पैसे मिळाले नाही असे सांगितले, त्यामुळे अमोल देशमुख यांना धक्काच बसला. ५० हजार रूपये गेले कुठे या चिंतेत अमोल देशमुख यांनी संपूर्ण रात्री जागुन काढली.
सकाळी बॅंकेत जाऊन चौकाशी केली असता ती ५० हजारांची रक्कम शारी येथील विमल वामन राठोड यांच्या खात्यात गेल्याचे समजले. त्यानंतर अमोल यांनी शेतकरी महिला विमल बाई यांना हा प्रकार सांगितला आणि विमल बाई यांनी एका शब्दावर खात्यात जमा झालेली रक्कम काढून दिली. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशावेळी शेतकरी महिलेच्या खात्यात आयतेच ५० हजार रुपये आले, अशा प्रसंगात कोणाचीही नियत फिरली असती. मात्र विमल बाई यांनी अडचणीतही प्रामाणिकपणा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.