Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला; इसापूर धरणात कयाधू नदीचे पाणी सोडण्यास विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

Hingoli News : नदीचे पाणी धरणात गेल्यास हिंगोली जिल्ह्याचा दुष्काळामुळे वाळवंट होईल; असा आरोप यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजी माने यांनी केला आहे. दरम्यान शासनाने जाहीर केलेली ही निविदा तातडीने रद्द करावी

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या कयाधू नदीवर बांधारा तयार करून ईसापुर धरणात पाणी सोडण्यासाठी शासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे. यानंतर हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला आहे. आज हिंगोलीत सिंचन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवल्यास सिंचन संघर्ष समितीचा विरोध आहे. नदीचे पाणी धरणात गेल्यास हिंगोली जिल्ह्याचा दुष्काळामुळे वाळवंट होईल; असा आरोप यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजी माने यांनी केला आहे. दरम्यान शासनाने जाहीर केलेली ही निविदा तातडीने रद्द करावी; अन्यथा निवडणुकीत याचा परिणाम भोगावा लागेल असा इशारा देखील यावेळी मोर्चेकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.  

जिल्हाधिकारी कार्यलयावर घोषणाबाजी 

संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात जिल्ह्यातील शेकडो (Farmer) शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोह्चल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करत निविदा रद्द करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT