Hingoli Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Water Crisis : दुष्काळाची दाहकता वाढली; हिंगोली जिल्ह्यात ५१ तलाव कोरडे ठाक

संदीप नागरे

हिंगोली : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. प्रामुख्याने पाण्याची समस्या भेडसावत असून हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे, कमी पावसामुळे तलावात साचलेले पाणी आटत चालले असून हिंगोली जिल्ह्यात असलेले ५१ लहान मोठे तलाव कोरडे ठाक पडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने (Hingoli) हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा व हिंगोली या पाचही तालुक्यात असलेल्या ५१ लहान- मोठ्या तलावातील पाणीसाठा मे महिन्याच्या सुरुवातीलाच संपला आहे, कडक उन्हाळ्यात देखील जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध असणारे हे तलाव यंदाच्या वर्षी मात्र कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे शेत शिवारात (drought) आलेल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

पाण्यासाठी कोसोदूर भटकंती 

तलावातील पाणी आटले असून गावात देखील टँकरने येणारे पाणी कमी पडत आहे. यामुळे नागरिकांना देखील या पाणी टंचाईचा (Water Scarcity) मोठा फटका बसत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. भर उन्हात पाणी आणावे लागत असल्याचे चित्र सध्या हिंगोली जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT