Farmer Protest कैलास चौधरी
महाराष्ट्र

पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच शेतामध्ये अन्नत्याग आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

ओस्मानाबाद - जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी (Farmer) अद्याप पीक विमा पासून वंचीत आहेत. त्यांना अद्याप पीक विमा रक्कम न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम येथील शेतकरी आक्रमण झाले आहेत. बसव प्रतिष्ठाणच्या माध्यमातून एकत्र येत रामलिंग पुराणे व इतर शेतकऱ्यांनी शेतामध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे .या प्रकरणी पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निवेदन देवुन अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

हे देखील पहा -

त्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल होत. यामध्ये उमरगा तालुक्यातील मुरूम व परिसरातील काही गावांना 2019-20 च्या पीक विम्यातूनही वगळण्यात आले होते. त्याच बरोबर त्यांना 2020-21 चा देखील पीक विमा अद्याप मिळाला नसल्याने सर्व शेतकरी आक्रमक होत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

SCROLL FOR NEXT