- मनोज जयस्वाल
Washim News : सुरळीत विद्युत पूरवठ्याची मागणी करीत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदाेलनामुळे महावितरण कार्यालयातील कर्मचा-यांची तारांबळ उडाली. (Maharashtra News)
खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा या पिकाची पेरणी केली. या पिकांना पाण्याची गरज असताना विज वितरण कंपनी पूरेसा विद्युत पूरवठा करत नसल्याचा आराेप शेतक-यांनी केला आहे.
दरम्यान विज वितरणच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास याही पेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या अधिका-यांना दिला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.