डॉ.सचिन बालकुंदे यांचा जानाई प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

डॉ.सचिन बालकुंदे यांचा जानाई प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार

किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयात वेगवेगळे उपक्रम राबवून, अनेक अत्यवस्थ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून वाचवण्याचे काम केल्यामुळे लातूर येथील जानाई प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बालकुंदे यांचा सत्कार करण्यात आला.

Krushnarav Sathe

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी ग्रामीण रुग्णालयाचा कोरोना काळातील मृत्युदर हा एक टक्‍क्‍यांपेक्षाही कमी होता. या काळात लागणारे साहित्य सामग्री याचा अभाव असताना सुद्धा 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉ. बालकुंदे सक्षमपणे काम करत होते. Dr. Sachin Balakunde felicitated by Janai Pratishthan

हे देखील पहा -

अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी रुग्णांना लागणारा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि रुग्णांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच अनुषंगाने आज लातूर मधील श्री जानाई प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉ.सचिन बालकुंदे यांना डॉक्टर जानाई श्री पुरस्कार 2021 देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कारामध्ये डॉक्टर सचिन बालकुंदे आणि पत्नी या दोघांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि रोख पंचवीस हजार रुपये रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. बालकुंदे यांनी गेल्या जवळपास वर्षापासून कोरोनाला रोखण्यासाठी किल्लारी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत सक्षमपणे कामी केले. कोणत्याही अपुर्‍या सुविधांचा अभाव लक्षात न घेता सुद्धा कोरोना काळामध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार त्यांच्यामाध्यमातून देण्यात आले.

याच कार्याची दखल घेत श्री जानाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील डॉक्टरांना या सत्काराच्या माध्यमातून ऊर्जा मिळेल आणि पुढील काळामध्ये आणखीन लढण्यासाठी बळ मिळेल अशी प्रतिक्रिया डॉ.सचिन बालकुंदे यांनी यावेळी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

SCROLL FOR NEXT