जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक
जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक अरुण जोशी
महाराष्ट्र

जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक

अरुण जोशी

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या District Bank संचालकांसाठी Director अर्जांचे applications अर्धशतक पूर्ण झाले आहे. गुरुवारी ४२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांतील अर्जांची एकूण संख्या ५० वर पोहोचली आहे. ६ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने ३ आणि ४ सप्टेंबर व ६ सप्टेंबर असे तीन दिवस शिल्लक आहेत.

हे देखील पहा-

५ सप्टेंबरचा रविवार असल्याने त्यादिवशी नामांकनाची प्रक्रिया बंद राहणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्टपासून नामांकनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ सप्टेंबरला ८ तर २ सप्टेंबरला ४२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत, असे निवडणूक यंत्रणेतील सहाय्यकारी अधिकारी तथा सहायक निबंधक पारिसे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान १ सप्टेंबरला माजी आमदार MLA नरेशचंद्र ठाकरे, राकाँचे अरुण पाटील गावंडे, अभय गावंडे, मनीष कोरपे आणि अनिल जळमकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

दुसऱ्या दिवशी अकोटचे Akot आमदार प्रकाश भारसाकळे, जि.प. चे माजी पदाधिकारी हरिभाऊ मोहोड, शिवाजी शिक्षण संस्थेचे दिनकर गायगोले यांच्यासह माजी संचालक अभिजीत ढेपे, रवींद्र गायगोले, अशोक रोडे, नितीन हिवसे आणि अनंत साबळे तसेच सुभाष बोंडे, अनंत देशमुख, गोपाल चंदन, सुनील सिसोदे, राजेंद्र देशमुख, जयश्री देशमुख, अजय मेहकरे, राजेंद्र महल्ले, सतीश गोटे, प्रिती जायले, माया हिवसे, ज्योत्सना सदार आणि संतोष कोल्हे आदींनी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT