महाराष्ट्र

विज कोसळून कुटुंब निराधार; चारही कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्‍याचे रेशन

विज कोसळून कुटुंब निराधार; चारही कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्‍याचे रेशन

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे काही दिवसांपूर्वी विज कोसळून चार कुटुंबाचे नुकसान झाले होते. यात मयत झालेल्या दोन कुटुंबांना व कायम अपंगत्‍व आलेल्या दोन अशा एकूण चार कुटुंबांना पटेल परिवारातर्फे दोन महिन्याचे रेशन किराणा वाटप करण्यात आले आहे. (dhule-shirpur-news-Powerless-family-Ration-of-two-months-to-all-four-families-by-Patel-family)

माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यावतीने नुकसानग्रस्तांना तसेच आपतग्रस्तांना नेहमीच तातडीने मदत करण्यात येते. शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते नुकसानग्रस्त चार कुटुंबांना दोन महिन्याचे रेशन वाटप करण्यात आले. या चारही कुटुंबांची भेट घेऊन आमदार काशिराम पावरा यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

१० जुलै काळ बनून आला

कुरखळी येथे १० जुलैला चार जणांवर वीज कोसळली. त्यात दोन जण जागीच ठार झाले; तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. कुरखळी गावालगत शेतात विज पडून मनोज सुकलाल कोळी (वय ३०), सुनील सुदाम भिल (वय ३२) दोन्ही रा. कुरखळी (ता. शिरपूर) हे जागीच मयत झाले होते. तर समाधान बारकू भिल (वय ३०) व रवींद्र गुलाब भिल (वय २८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. या चारही कुटुंबांना दोन महिन्याचे रेशन संपूर्ण किराणा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT