बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. ११ जुलै २०२४
उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याच्या निर्णयाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या नामांतराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आहे. पुढील दोन आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असून उच्च न्यायालयाने हात वर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या नामांतराच्या निर्णयाला कृती समितीने विरोध दर्शवला असून गेल्या दोन वर्षांपासून यासंबंधीचा वाद सुरू आहे. तसेच न्यायालयाचे दार ठोठावले होते.
याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास मनाई करत हे प्रकरण निकाली काढले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान न झाल्याने आता या कृती समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, पुढील दोन आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे धाराशिवच्या नामांतराबाबत सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.