गणेश कवडे, साम टीव्ही
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीनं जोर धरला होता. मुंडेंनी ४ मार्चला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील संकटं कमी होताना दिसत नाहीयेत.
कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुंडेंवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
माजी मंत्री धनंजय देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यावरील संकटं कमी होताना दिसत नाहीयेत. आता सुरेश धस यांनी थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागातील कथित घोटाळाप्रकरणी सुरेश धस ईडीला पत्र लिहून ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरेश धस यांनी यापूर्वीच दावा केला होता की, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागातील तब्बल २०० कोटी रूपये परस्पर उचलली होती. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील पुराव्यानिशी कृषी घोटाळाप्रकरणी मुंडेंवर आरोप केले होते.
त्यामुळे कृषी विभागातील कथित घोटाळाप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुरेश धस थेट ईडीला पत्र लिहून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
घोटाळ्याच्या आड येणाऱ्यांची बदली
कृषी विभागातील २०० कोटी रूपये उचलल्याचा आरोप करत सुरेश धस यांनी आणखी एक मुंडेंवर आरोप केला होता. घोटाळ्याच्या आड येणाऱ्या तत्कालीन कृषी सचिव डॉ. प्रवीण गेडाम, व्हि. राधा, रवींद्र बिनवडे तसेच अन्य ४ कृषी सचिवांच्या बदल्या करण्यात आल्याचा आरोप धस यांनी केला होता. मुंडेंच्या काळात कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्याही आर्थिक व्यवहार करूनच झाल्या असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.