Mla Suhas Kande saam tv
महाराष्ट्र

Nashik News : तालुका दुष्काळी जाहीर न झाल्यास न्यायालयात जाणार : आमदार सुहास कांदे

आज (बुधवार) आमदार सुहास कांदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News : नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. 36 पैसे आणेवारी लावली गेलेली असताना नांगदाव दुष्काळी तालुका जाहीर होत नसेल तर थेट न्यायालयात जावे लागेल असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी (mla suhas kande) दिला आहे. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्यात यंदा पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. नांदगाव तालुक्यात जून ते सप्टेंबर दरम्यान इतर तालूक्याच्या तुलनेत केवळ 64.3 टक्के पाऊस झाल्याची नोंद झालेली असताना ट्रिगर 1 आणि 2 मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश झाला नाही.

त्यामुळे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे संतप्त झाले आहेत. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असूनही जर 36 पैसे आणेवारी लावली गेलेली असताना दुष्काळी तालुका जाहीर होत नसेल तर थेट न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार कांदे यांनी दिला आहे.

आजी माजी पालकमंत्री यांचा मालेगाव व येवला तालुका ट्रीगर 2 मध्ये दाखविला जातो मग माझ्या मतदारसंघात कमी पाऊस होऊन तो ट्रिगर 1,ट्रिगर 2 मध्ये बसत नाही का असा सवाल आमदार कांदे (suhas kande) यांनी उपस्थित केला आहे.

शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला नाही तर न्यायालयात दाद मागू असा इशारा देत या अगोदर आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT