Code Of Conduct Saam Tv
महाराष्ट्र

Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? नियमांचे पालन न केल्यास होऊ शकतो तुरुंगवास

Election Commission : भारतात लोकशाही आहे. निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग नावाची शासकीय यंत्रणा स्वतंत्र काम करते. निवडणुका केव्हा घ्यायच्या याबाबत येथे ठरवले जाते.

Ruchika Jadhav

Code Of Conduct Rule :

निवडणुका लागल्यावर सर्वांच्या कानी आचारसंहिता हा शब्द पडतो. सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागते हे माहिती आहे. मात्र ही या आचारसंहितेते कोणते नियम आहेत? आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? या काळात मतदार आणि उमेदवारांनी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नयेत याबाबत माहिती जाणून घेऊ.

भारतात लोकशाही आहे. निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग नावाची शासकीय यंत्रणा स्वतंत्र काम करते. निवडणुका केव्हा घ्यायच्या याबाबत येथे ठरवले जाते. लोकशाही असल्याने कोणत्याही व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने मते मिळवू नये. मताच्या गोपनीयतेचा आदर व्हावा आणि लोकांनी निवडून दिलेला योग्य उमेदवार समोर यावा अशी यामागची मुख्य विचारधारा आहे.

आचारसंहिता म्हणजे का?

इलेक्शनची तारीख जाहीर झाल्यावर आचारसंहिता सुरू होते. आचारसंहीतेमध्ये सर्व पक्षांना आणि उभे असलेल्या उमेदवारांना काही नियम आणि अटींचं पालन करावं लागतं. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते.

आचारसंहिता कधीपासून कधीपर्यंत असते?

निवडणूक आयोग कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आधी एक पत्रकार परिषद घेतली जाते. या पत्रकार परिषदेमध्ये तारखा जाहीर केल्या जातात. तारीख जाहीर झाल्यानंतर तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता सुरूच असते.

कोणकोणत्या ठिकाणी आचारसंहिता लागू असते?

कोणती निवडणुक आहे त्यानुसार आचारसंहिता लागू केली जाते. म्हणजे जर लोकसभेची निवडणूक असेल तर भारतात आचारसंहिता लागू केली जाते. त्यानंतर विधानसभा निवडणुका असल्यास त्या राज्यात आचारसंहिता असते. त्यानंतर एखादी पोटनिवडणूक असल्यास त्या त्या मतदारसंघापुरती आचारसंहिता लागू असते.

वैशिष्टे

  • आचारसंहितेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांचा निवडणूक प्रचार, सभा तसेच मिरवणुकीबाबत नियमावली देण्यात आली आहे. यातील नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.

  • निवडणूक तसेच मतमोजणी याबाबत देखील या आराखड्यात महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

  • प्रचारासाठी असलेली बंधने

  • निवडणुकीच्या प्रचारावेळी धार्मिक आधार घेऊ नये.

  • मंदिर, मशिद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी सभा ठेवू नये.

  • दोन-जाती आणि धर्मात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत.

  • निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापासून १०० मिटरटच्या आत प्रचार करू नये.

  • आचार संहिता जाहिर झाल्यावर एखाद्या मंत्र्याला विकासकामांचे उद्घाटन करता येत नाही.

  • प्रचारासाठी पोलिसांची पनवानगी घ्यावी. परवानगी शिवाय कोणत्याही व्यक्तीच्या घरावर, कार्यालयावर आपले बॅनर लावू नये.

उल्लंघन केल्यास होणारी कारवाई?

आचारसंहिता सुरू असताना यातील नियमांचं उल्लंघन केल्यास त्या राजकीय पक्षावर किंवा उमेदवारावर कारवाई केली जाते. आदर्श आचारसंहिता पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई होते. यामध्ये उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकते. मोठ्या नयमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये सदर व्यक्तीस तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना, विसर्जनाहून परतताना ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

Sanjay Raut At Dasara Melava: या शिवतीर्थाच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ; संजय राऊतांचं महत्वपूर्ण विधान|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: दिल्लीतील रावणाला जाळायचं आहे - संजय राऊत

Badlapur Tourism : शहराच्या धावपळीपासून दूर वसलंय निसर्गरम्य ठिकाण, वीकेंडला बदलापूरला ट्रिप प्लान करा

Ravan Dahan: वरुणाराजाच्या माऱ्यापुढे रावणाची हार; वादळी पावसानं उडवलं मुडकं, तर कुठं रावणनं घेतली झोप| Video

SCROLL FOR NEXT