Corona: निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक: पहा आरोग्यमंत्री काय म्हणाले...  Saam Tv
महाराष्ट्र

Corona: निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक: पहा आरोग्यमंत्री काय म्हणाले...

जशी रुग्ण संख्या कमी होईल तसे निर्णय घेणार आरोग्यमंत्री

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: सध्या राज्यभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधी पर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यात (Jalna) दिली आहे. सध्या राज्यात (state) मास्क (Mask) मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली आहे. (CM positive about reducing restrictions)

हे देखील पहा-

राज्यात रुग्णसंख्या (patients) कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे लसीकरण (Vaccination) करून घ्याव असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध (Restrictions) कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली आहे.

ज्यावेळी तिसऱ्या लाटेची सुरूवात झाली. तेव्हा कमाल ४८ हजारांपर्यंत रुग्ण सापडत होती. ते कमी- कमी होत आधी २५ हजार मग ६ हजार आणि आता अगदी कमी रुग्ण सापडत आहेत. यामुळे साधारण मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसून येत आहे. यामुळे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याविषयी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: उन्हामुळे त्वचेची डल पडली आहे? घरी तयार केलेला हा फेस स्क्रब आठवड्यातून ३ वेळा नक्की वापरा

प्रशासनात मोठा उलटफेर होणार; 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीची शक्यता, थेट दिल्लीत पोहोचली चर्चा

Gudi Kalash Importane: गुढीवर तांब्याचा कलश उलटा का ठेवतात?

Chanakya Niti: लोक सहज फसवून जातायेत? या ४ ठिकाणी विश्वास दाखवणं पडेल महागात, वेळीच व्हा सावध

Maharashtra Politics: दिल्लीहून परतताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, ठाकरेंचे 4 नगरसेवक फोडले; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT