Manasvi Choudhary
गुढी पाडवा हा मराठी वर्षातील सर्वात पहिला महत्वाचा सण आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारून तिची पूजा केली जाते.
गुढी उभारताना त्यावर कलश उलटा ठेवलेला असतो. तुम्ही देखील पाहिलं असेल,
मात्र गुढीवर कलश उलटा ठेवण्याचा नेमका अर्थ काय आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
माहितीनुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्विक लहरी निर्माण करते.
तांब्याची दिशा सुलट ठेवली तर संपूर्णत: ऊर्ध्व दिशेने लहरी बाहेर निघताता आणि जमिनीलगतच्या काही स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठरावीक अशा ऊर्ध्व पट्याचेच शुद्धीकरण होते.
गुढीवर उलटा ठेवलेला कलश घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा संचार करतो.गुढीवर तांब्याचा कलश ठेवण्याआधी त्यावर स्वस्तिक काढले जाते स्वस्तिक शुभ चिन्ह मानले जाते.
कलश शांती आणि समृद्धीचा प्रतीक आहे. उलटा ठेवलेला कलश हा शांती आणि समृद्धी परत येत आहे असे दर्शवितो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.