Poshan Aahar  saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar: गुरुजी, खिचडी कधी मिळेल हो? राज्यातील ८८ लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न; 2 महिन्यांपासून मिळेना पोषण आहार

Poshan Aahar Yojana: पोषण आहाराचा पुरवठा मागील सुमारे दोन महिन्यापासून बंद असल्याने राज्यातील अनेक शाळांमध्ये खिचडी शिजलेली नाही.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यातील जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळामधील आठवीपर्यंतचे ८८ लाखाहून अधिक विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत. शालेय पोषण आहार पुरविण्यासाठीची निविदा प्रक्रिया रखडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोषण आहाराचा पुरवठा मागील सुमारे दोन महिन्यापासून बंद असल्याने राज्यातील अनेक शाळांमध्ये खिचडी शिजलेली नाही. येत्या ८ ते १० दिवसात तांदूळ मिळाला नाही तर ९० शाळामधील पोषण आहार बंद होण्याची शक्यता आहे.

सध्या कुठे काय स्थिती?

सध्या काही शाळा त्यांच्याकडे शिल्लक असलेला तांदूळ आणि इतर साहित्यातून शालेय पोषण आहार शिजवून मुलांना देत आहेत. पोषण आहाराचा तांदूळ काही जिल्ह्यांत दर महिन्याला शासकीय गोदामात जमा होतो. तर काही जिल्ह्यांमध्ये त्याचा थेट शाळांना पुरवठा केला जातो.

पुरवठा करण्याचा नवीन करार झालेला नाही. जुन्या पुरवठादाराकडे करारानुसार मागणी करता येत नाही. अनेक शाळांनी पोषण आहार संपल्याचे तोंडी कळविले आहे, तर काही शाळांकडे आठवडाभर पुरेल इतका पोषण आहार शिल्लक असल्याने अशा शाळांनी अद्याप मागणी नोंदवलेली नाही. (Latest Marathi News)

राज्यात सध्या काय स्थिती?

एकूण शाळा - ६७,५४९

एकूण विद्यार्थी - ८८,६७,३०४

मासिक किती तांदूळ येतो? - ३०,६५७ मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली - ८,८४६

मराठवाडा

एकूण शाळा - १७,५१५

एकूण विद्यार्थी - २३,०३,१७०

मासिक किती तांदूळ येतो - ५,६१६ मेट्रिक टन

किती शाळानी मागणी केली? - ४.७२५

विदर्भ

एकूण शाळा - १२,८०७

एकूण विद्यार्थी - १२,९९,१७५

मासिक किती तांदूळ येतो? - ३,९९९ मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली? - १,२२२

कोकण

एकूण शाळा - ७,५४८

एकूण विद्यार्थी - ८,०३,५२९

मासिक किती तांदूळ येतो? - १,४९० मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली? - उपलब्ध नाही

उत्तर महाराष्ट्र

एकूण शाळा - ११,३८३

एकूण विद्यार्थी - १८,८४, १५२

मासिक किती तांदूळ येतो? - ११,९४८ मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली? - ११८

पुरवठ्याकडे लक्ष कोण देणार?

गेल्या दोन महिन्यांपासून ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये असताना पोषण आहार देणारे सरकारी विभाग, सरकारी अधिकारी आणि सरकार हे मात्र मूग गिळून गप्प आहेत. अशा स्थितीत गरिबांच्या लेकरांना मिळणाऱ्या पोषण आहाराकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी, तेल व्यापार चीनचे चलन युआनमध्ये करणार?

SCROLL FOR NEXT